शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांना स्थगिती देता येईल काय?; सुप्रीम कोर्टाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:39 IST

आंदाेलनासंदर्भातील याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बाेबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेतकऱ्यांना आंदाेलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देता येईल का, अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा हाेणे आवश्यक असून त्यासाठी निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आंदाेलनासंदर्भातील याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बाेबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेतकऱ्यांना आंदाेलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. न्या. बाेबडे म्हणाले की, काेणतेही आंदाेलन ताेपर्यंत वैध ठरते जाेपर्यंत मालमत्ता किंवा प्राणहानी हाेत नाही. इतर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही, अशा पद्धतीने आंदाेलनात बदल करता येऊ शकताे का, याबाबत न्यायालयाने केंद्राला विचारणा केली. कायद्यांना स्थगिती दिल्यास शेतकरी चर्चेसाठी पुढे येणार नाही, असा युक्तिवाद केंद्राने केला. न्यायालयाने ताे फेटाळला.सुनावणीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गाेयल आणि नरेंद्रसिंह ताेमर यांच्यासाेबत भाजपच्या मुख्यालयात बैठक घेतली. न्यायालयाने दिलेल्या सूचनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.सुप्रीम कोर्टात काय  झाले ?समितीचा प्रस्तावकृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांच्यासह कृषी संघटनांच्या प्रतिनिधींची एक समिती स्थापन करण्याची सूचना सरन्यायाधीशांनी केली. समितीच्या शिफारसींचे पालन करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्राची कानउघाडणीशेतकरी हट्ट धरून बसल्याचे केंद्राने म्हणताच न्यायालयाने केंद्राची कानउघाडणी केली. सरकारही हटवादी असल्याचे शेतकऱ्यांनाही वाटू शकते. तुमचे प्रस्ताव शेतकरी स्वीकारतील असे वाटत नाही, असे न्यायालय म्हणाले. शेतकऱ्यांना खडे बाेल काेणत्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नसून तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या शहराची काेंडी करू शकत नाही, असे खडे बाेलही न्यायालयाने आंदाेलकांना सुनावले.‘आप’ने फाडली कृषी कायद्याची प्रतआणखी किती बळी घेणार, असा प्रश्न करतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या सदस्यांनी विधानसभेत कृषी कायद्याची प्रत फाडली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी आंदोलन आणि कोर्टाचे म्हणणे या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली आहे.काेराेनाची भीतीशेतकरी गावी गेल्यानंतर तिथे काेराेना पसरण्याची भीती असल्याचे सांगून इतरांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार आंदाेलकांना नाही, असा युक्तिवाद महाधिवक्ते के. के. वेणुगाेपाल यांनी केला. आंदाेलनामध्ये आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असून  कडाक्याच्या थंडीमुळे ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे बाेलले जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय