शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मायावती, मुलायम सिंह, राजनाथ यांना सरकारी बंगले सोडावे लागणार; सुप्रीम कोर्टाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 14:05 IST

माजी मुख्यमंत्र्यांचे बंगले जाणार

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना बंगले सोडावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होताच कोणतीही व्यक्ती सर्वसामान्य होते, असं सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण आदेश देताना नमूद केलं. न्यायालयानं दिलेला हा आदेश उत्तर प्रदेश सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. लोक प्रहरी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयानं यूपी मिनिस्टर सॅलरी अकाऊंट अॅण्ड मिसलेनियस प्रोव्हिजन अॅक्टमधील काही तरतुदी रद्द केल्या. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी आदेश देताना या कायद्यातील कलम 4(3) रद्द केले. या तरतुदींच्या आधारे माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगल्यांमध्ये वास्तव्य करण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र आता या तरतुदी रद्द करण्यात आल्यानं माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे अनेक दिग्गज नेत्यांना सरकारी बंगले सोडावे लागतील. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, बसपा अध्यक्ष मायावती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आणि माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले हे नेते सध्या अवघं साडे पाच ते साडे तारा हजार रुपये भाडं भरुन सरकारी बंगल्यांमध्ये राहतात. 

३० वर्षांपासून बंगला तिवारींच्या ताब्यातनारायण दत्त तिवारी १९८९ साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नंतर त्या राज्याचे विभाजन झाले आणि उत्तराखंड हे नवेराज्य तयार झाले. ते २00२ ते  २00७ या काळात उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी उत्तर प्रदेशमधील सरकारी बंगला कायम ठेवला. त्यानंतर ते २00९ पर्यंत आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. ते सध्या काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडात भाजपाचे सरकार यावे, यासाठी पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांना आशीर्वाद दिले होते. यूपीने केला कायदा, कोर्टाने झापले! माजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले बंगले सरकारने रिकामे करून घ्यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २0१६ सालीच उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. मात्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. शिवाय माजी मुख्यमंत्र्यांना कायमस्वरूपी सरकारी बंगल्यात राहता येईल, अशी तरतूद संबंधित कायद्यात गेली. त्याबद्दल न्यायालयाने आज उत्तर प्रदेश न्यायालयात खूपच फटकारले. उत्तर प्रदेश सरकारची कायद्यातील तरतूद पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधी आहे, असे सुनावताना मनमानी पद्धतीने असा कायदा करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली.

राम नरेशनी आधीच सोडला बंगलामाजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनाही सरकारी बंगला देण्यात आला होता. पण न्यायालयाचा निकाल येण्याआधीच यादव यांनी आपला बंगला रिकामा करून दिला. मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती व नारायण दत्त तिवारी सध्या कोणत्याही सत्तापदावर नाहीत. राजनाथ सिंह हे केंद्रात गृहमंत्री आहेत, तर कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवmayawatiमायावतीRajnath Singhराजनाथ सिंह