शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

झुंडशाही रोखा, सुप्रीम कोर्टाचा निर्वाणीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 06:40 IST

ठरावीक विचारसरणीने समाजाचे होणारे ध्रुवीकरण आणि उभ्या राहणाऱ्या झुंडशाही हिंसाचाराच्या भस्मासुराने प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी करण्याआधीच सरकारने या उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बिमोड करावा

नवी दिल्ली : ठरावीक विचारसरणीने समाजाचे होणारे ध्रुवीकरण आणि उभ्या राहणाऱ्या झुंडशाही हिंसाचाराच्या भस्मासुराने प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी करण्याआधीच सरकारने या उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बीमोड करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. लोकशाही व्यवस्था, बहुढंगी संस्कृती व सहिष्णू बंधुभावाचा वारसा टिकवायचा असेल, तर झुंडशाही फोफावण्याआधीच तिला नख लावण्याखेरीज अन्य पर्याय नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.कायद्याची जरब हा सुजाण समाजाचा पाया असल्याने, जमावांकडून होणारी हिंसा हा स्वतंत्र गुन्हा ठरविणारा कायदा संसदेने करावा आणि त्यात कडक शिक्षेची तरतूद करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.गोहत्या व गोमांस भक्षणाच्या संशयावरून गोरक्षकांकडून विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाणीच्या व प्रसंगी हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या काही याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या. अलीकडे मुले पळविण्याच्या अफवांनी महाराष्ट्रासह काही राज्यांत काहींच्या हत्या झाल्या. समाज माध्यमांतील अफवांवरून झुंडशाहीकडून संशयितांच्या हत्यांचे पेव फुटले. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या दोन्ही प्रकारच्या झुंडशाहीचा समग्रपणे परामर्श घेणारे ४५ पानी निकालपत्र दिले.>न्यायालयाची टिप्पणीकाही मूठभर लोकांना, कोणत्याही कारणाने कायदा हाती घेऊन परस्पर न्यायनिवाडा करू दिला, तर त्यातून अराजकता माजेल. अशा झुंडशाहीला वेळीच खंबीरपणे आवर घातला नाही, तर प्रस्थापित व्यवस्था पार उद्ध्वस्त होईल. असहिष्णुता आणि असत्य माहिती व अफवांवरून देशभरात जमावांकडून होणाºया हत्यांच्या घटना भयावह आहेत. त्यातून आपला हा महान देश सहिष्णुता आणि बंधुभावाची शाश्वत मूल्ये हरवून बसला की काय, अशी शंका येते.>सहा महिन्यांत खटले निकाली काढाझुंडशाहीविरोधी कोणताही स्वतंत्र कायदा सध्या तरी नसल्याने, अशी प्रकरणे प्रचलित कायद्यानुसारच हाताळावी लागतील. तरीही ते करताना दिरंगाई, हेळसांड आणि कसूर यास जागा राहू नये, यासाठी निश्चित चौकट व निकष ठरवून दिले गेले. झुंंडशाहीच्या पीडितांना तत्परतेने पुरेशी भरपाई देणे, त्यांना आणि साक्षीदारांना संरक्षण देणे, असे खटले विशेष जलदगती न्यायालयांत चालवून, शक्यतो सहा महिन्यांत निकाली काढा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. काही मंडळींनी मूळ याचिकांमध्ये सहभागी होऊन विविध सबबी देत, अशा झुंडशाहीचे लंगडे समर्थन करणारा युक्तिवाद केला होता. मात्र, त्यांना ठामपणे झिडकारत न्यायालयाने, काही झाले, तरी कोणालाही कायदा हातात घेऊन आपल्या मतांनुसार न्याय करण्याचे स्वातंत्र्य कदापि दिले जाऊ शकत नाही, हे अधोरेखित केले.कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारितील विषय असल्याने, अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्यांवर टाकली. अशी झुंडशाही होऊच नये, यासाठी कोणते उपाय योजावेत व ते घडलेच, तर ते कठोरतेने कसे हाताळावेत, याची मार्गदर्शिकाही न्यायालयाने ठरवून दिली. हे सर्व उपाय महिनाभरात अंमलात आणणे राज्यांना बंधनकारक केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय