शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 07:41 IST

मराठा आरक्षण : एमबीबीएस, डेंटल पीजी कोर्सेससाठी प्रवेश

नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ त प्रवेश देताना मराठा समाजाला १२ टक्के राखीव जागा लागू न करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारला द्यावा, या सहा एमबीबीएस डॉक्टर्सनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेमहाराष्ट्र सरकारला आपले म्हणणे सादर करण्यास नऊ जून रोजी सांगितले.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या या सुनावणीत स्पष्ट केले की, पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठीचेराज्यातील प्रवेश (शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१) हे मराठा आरक्षणाच्या कायद्याला दिल्या गेलेल्या आव्हान याचिकेचा निकाल काय लागतो याच्यावर अवलंबून असतील. डॉक्टरांचे वकील अमित आनंद तिवारी, राजीव कुमार पांडेय आणि विवेक सिंह यांनी बाजू मांडल्यानंतर खंडपीठाने राज्य सरकार, स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल आणि वैद्यकीय समुपदेशन समितीला नोटीस दिली.आदित्य बिमल शास्त्री यांच्यासह सहा एमबीबीएस डॉक्टर्सनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आम्ही नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स (नीट-पीजी २०२०) गुणवत्तेसह उत्तीर्ण झालो असून आमच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आम्हाला न्यायालयात धाव घेणे भाग पडले. या याचिकेवर आता सात जुलै रोजी सुनावणी होईल.या याचिकेसोबत मराठा आरक्षण कायद्याला दिल्या गेलेल्या आव्हानाच्या इतर याचिकांवरही विचार होईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र