शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

सत्तासंघर्षाचा लवकरच फैसला; सुनावणी संपली, घटनापीठाने राखून ठेवला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 06:00 IST

दोन्ही गटाचे युक्तिवाद संपल्यानंतर घटनापीठाने निर्णय राखून ठेवला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज अखेर संपली. दोन्ही गटांच्या वकिलांनी राज्यघटनेतील तरतुदी व जुन्या निकालांचे दाखले देत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आता शिंदे गटाच्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचा काय निकाल लागेल, यावर सारे अवलंबून राहणार आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद संपल्यानंतर घटनापीठाने निर्णय राखून ठेवला.

गेल्या २३ ऑगस्टला हा खटला पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने घेतला. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी घटनापीठापुढे सुरू आहे. घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याशिवाय न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

सिंघवी यांचे मुद्दे : अभिषेक मनु सिंघवी यांनी शिंदे गटाने राज्यघटनेत असहमती व्यक्त करण्यासाठी असलेल्या मार्गांचा अवलंब न करता एका वेगळ्याच मार्गाचा अवलंब केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी असल्यास ते पक्षाच्या व्यासपीठावर बोलता येते; परंतु या मार्गांचा अवलंब न करता पक्षात फूट पाडण्याचा मार्ग अवलंबिल्यामुळे त्यांना अनुसूची १० नुसार कारवाईस सामोरे जावे लागेल. पक्षाचा प्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार हा पक्षालाच आहे. विधिमंडळातील गटनेत्याला नाही. शिंदे गटाच्या सदस्यांना पूर्ण जाणीव होती की, आपण अपात्र घोषित होऊ, त्यामुळेच ते आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करीत होते. खरी शिवसेना ते आहेत तर आसाममध्ये भाजपच्या कुशीत का जाऊन बसले होते.

सरन्यायाधीश हेच आशास्थान 

सिब्बल युक्तिवाद करताना म्हणाले, आज लोकशाहीचे लचके तुटत असताना १४० कोटी जनता आज आपल्याकडे (डॉ. धनंजय चंद्रचूड) आशेने पाहत आहे.

सरन्यायाधीशांचे प्रश्न

सरन्यायाधीश : राजकीय पक्षातील सदस्य बाहेर पडले; परंतु ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले नाही, तर काय? 

सिब्बल : राज्यघटनेच्या अनुसूची १० नुसार कारवाईस सदस्य पात्र आहेत. त्यांना वेगळा पक्ष स्थापन करण्याची मुभा आहे किंवा राजीनामा देऊन नव्याने निवडून येणे, हाच त्यांच्यापुढे बचाव आहे.

सरन्यायाधीश : पक्षाच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास उरला नाही व त्यांना दुसऱ्या पक्षात विलीनही व्हायचे नाही, तर काय? 

सिंघवी : पक्षाचे व्यासपीठ उपलब्ध आहे; परंतु सरकार पाडायचे व त्यानंतर आपण खरा पक्ष असल्याचा दावा करायचे हे योग्य नाही.

सरन्यायाधीश :  उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला कारण त्यांना माहीत होते, आपल्याकडे बहुमत नाही. 

सिंघवी : राज्यपालांचा आदेश बेकायदेशीर व असंवैधानिक होता.

सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुद्दे

- राज्यपालांनी राज्यघटनेच्या कक्षेबाहेर जाऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.- शिंदे गटाचा आम्हीच शिवसेना हा दावा तकलादू आहे. आयोगाकडे जाताना त्यांनी फुटीर गट म्हणून उल्लेख केला आहे.- राज्यपालांनी शिंदे यांना पाचारण करताना सरकारिया आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे.- दोन पक्षांची आघाडी व्हायला हवी होती. शिंदे शपथ घेईपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष नव्हता. हे अनुसूची १०चे थेट उल्लंघन आहे.- विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही. विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्षाचे विस्तारित अंग आहे.- शिंदे यांना कोणतीही घटनात्मक ओळख नसताना राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली.

खरी शिवसेना कोणती? 

आज अखेरचा युक्तिवाद ठाकरे गटाचे देवदत्त कामत यांनी केला. यावेळी त्यांनी संस्कृत श्लोक ऐकविला. यात कावळा कोण व खरी शिवसेना कोणती हे निकालाच्या दिवशी समजेल, असे सांगून युक्तिवाद संपविला. 

ठाकरे गटाचे वकील: कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत शिंदे गटाचे वकील: हरीश साळवे, नीरज कौल, मणिंदर सिंग

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना