शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दिल्लीत फटाक्यांवर बंदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिले समिती बनवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:20 IST

- गेल्या काही दिवसांपासून राजधानीतल्या वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. डिझेलची वाहनं बंद करण्याच्या निर्णयानंतर आता फटाके फोडण्यावरही प्रतिबंध येणार आहे. फटाक्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली, दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून राजधानीतल्या वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. डिझेलची वाहनं बंद करण्याच्या निर्णयानंतर आता फटाके फोडण्यावरही प्रतिबंध येणार आहे. फटाक्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं फटाके बंद करण्यासाठी समिती बनवण्याचा आदेश दिल्ली सरकारला दिला आहे.तसेच दिल्ली सरकारकडून बनवण्यात येणा-या समितीला 31 डिसेंबर 2017मध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात ही समिती बनवण्यात यावी, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. डिसेंबर 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली- एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर पूर्णतः बंदी घातली होती. राजधानीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेता न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये ही याचिका टाकण्यात आली होती. न्यायालयानं आज या प्रकरणावर सुनावणी करत समिती बनवण्याचे निर्देश जारी केले आहेत. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठानं हे आदेश दिले आहेत.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात बनवण्यात आलेली समिती सामूहिकरीत्या दसरा आणि दिवाळीदरम्यान फोडण्यात येणा-या फटाक्यांनी लोकांच्या प्रकृतीवर होणा-या दुष्परिणामांचा अभ्यास करणार आहे. न्यायालयानं दिल्ली पोलिसांनाही फटकारलं आहे. फटाक्यांच्या व्यापा-यांना देण्यात येणा-या परवान्यांची संख्याही निम्म्यावर आली पाहिजे, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फटाका व्यापा-यांचे परवाने निलंबित करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2016 रोजी देण्यात आलेले आदेश काही वेळासाठी स्थगित करण्याचे आदेशही देण्यात आले होते. दिवाळीच्या नंतर याचा पुनर्विचार होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.