शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाष्य करणा-यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 09:30 IST

सोशल मीडियावर अश्लिल भाषा वापरत आक्षेपार्ह टीका करणा-यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान अशाप्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे यावर सहमती दर्शवली.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अश्लिल भाषा वापरत आक्षेपार्ह टीका करणा-यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान अशाप्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे यावर सहमती दर्शवली. वरिष्ठ वकिल फली नरीमन आणि हरीश साळवे यांनी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायाधीश सरकारी पक्षाचे असतात असा दावा करणा-या लोकांना चांगलंच सुनावलं. हे असे आरोप दुर्देवी असल्याचं न्यायालयाने सांगितलं. अशा लोकांनी कोर्टरुममध्ये येऊन बसलं पाहिजे, जेणेकरुन नागरिकांच्या अधिकारासाठी न्यायालय सरकारच्या विरोधात जाऊन निर्णय देते हे पाहता येईल असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. 

महत्वाच्या पदावर असणा-या व्यक्तींकडून एखाद्या प्रकणावर सोशल मीडियावर सामान्य व्यक्ती तसंच केसला प्रभावित करण्यासाठी करण्यात येणा-या कमेंटवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत व्यक्त केलं. अशा गोष्टींमुळे केसवर परिणाम होतो असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाष्य करणा-यांवरील कारवाईच्या वकिलांच्या मागणीवर सहमती दर्शवली. याचिकाकर्ता वकिलांना या गोष्टीवरही चिंता दर्शवली की, एखाद्या फौजदारी खटल्यातील प्रकरणात सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीने भाष्य केल्यास त्याचा प्रभाव पडू शकतो. 

बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आधारित ही याचिका दाखल करण्यात आली होती. आझम खान यांनी सामूहिक बलात्कार राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला होता. यानंतर पीडित कुटुंबाने आझम खान यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडिया