शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यांत निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 5:22 AM

निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : पाऊस कमी होत असलेल्या जिल्ह्यांत नागरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सूचित केले आहे. 

निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यांत नंतर निवडणुका घेता येऊ शकतात. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाला नागरी व स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश ४ मे रोजी दिले होते. नंतर राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोर्टाने प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.

आयोगाने समोर मांडल्या अडचणी

- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या निवडणुका पावसाळ्यात होणार का, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले होते. 

- राज्य निवडणूक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेण्यात कोणकोणत्या प्रशासकीय अडचणी समोर आहेत, हे सुप्रीम कोर्टात अर्जाद्वारे नमूद केले. 

- त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर मंगळवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली.

प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा

प्रभागांचे परिसीमन करणे आणि निवडणूक वेळापत्रक ठरविण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने दोन कायदे संमत करून स्वत:कडे घेतल्यानंतर १० मार्चरोजी निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरु करता येणार आहे. मुंबई व कोकण विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण खूपच जास्त असते. त्या तुलनेत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी असते. राज्यात १५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २१० नगरपंचायती तसेच १९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इतक्या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान २ ते ३ टप्प्यांत घ्याव्या लागतील.

हवामान खात्याच्या अंदाजावर निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालावर राज्य निवडणूक आयोगाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्याच्या कोणत्याही भागात तातडीने निवडणुका जाहीर केल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज, इतर आकडेवारी व अधिकृत माहितीच्या आधारावर निर्णय घेतला जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी पत्रकारांना सांगितले.

सप्टेंबर-ऑक्टोबरध्ये सरसकट निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मान्य केला नाही, पण फेटाळलाही नाही. मी स्वत: एकटा निर्णय घेऊ शकत नाही. सर्व संबंधित बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल. - यु.पी.एस. मदान, निवडणूक आयुक्त 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग