शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

'नॉट पॉसिबल...', बुलडोजरबाबत कपिल सिब्बल यांनी केलेल्या अजब मागणीवर सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 14:26 IST

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं आणि त्यांचं म्हणणं फेटाळून लावलं. संपूर्ण देशात तोडक कारवाईत बुलडोजर वापरण्यात बंदी घालण्यात यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर केली. त्यावर सुप्रीम कोर्टानं ही मागणी तर्क संगत नाही आणि ती स्वीकारता येणं शक्य नाही, असं नमूद केलं आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईवर बंदी घालणं शक्य नाही आणि यासाठी बुलडोजरची गरज असते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 

दिल्लीच्या जहांगीरपुरीमधील अतिक्रमण हटवण्याच्या विरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आजही सुनावणी सुरू ठेवली आहे. काल कोर्टानं याप्रकरणी तातडीनं सुनावणी देत दिल्ली पालिकेनं कारवाई आहे त्या परिस्थितीत स्थगित करण्याचे आदेश दिले होते. कोर्टानं आज झालेल्या सुनावणीत तोडक कारवाईवरील स्थगिती पुढील दोन आठवड्यांसाठी वाढवली आणि पुढील सुनावणीपर्यंत जहांगीरपुरीमध्ये बुलडोजर चालवला जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी यावेळी इतर राज्यातही बुलडोजरच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं नकार दिला. 

कोर्टाच्या नकारानंतर कपिल सिब्बलही बॅकफूटवरकोर्टानं संपूर्ण देशात बुलडोजरच्या वापरावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर कबिल सिब्बलही बॅकफूटवर आले आणि त्यांनी आपलं म्हणणं विशेषत: जहांगीरपुरीबाबत असल्याचं सांगत सारवासारव केली. जेव्हा तोडक कारवाई केली जाईल तेव्हा बुलडोजरचा वापर केला जाऊ नये असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर कोर्टानं तोडफोड नेहमी बुलडोजरनेच केली जाते असं म्हटलं. पण प्रत्येक कारवाईत बुलडोजरची गरज नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. अतिक्रमण केवळ एक राज्यापूरतं मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण देशभरात आहे. जहांगीरपुरीचं उदाहरण देताना कपिल सिब्बल म्हणाले की याठिकाणी मुस्लिमांवर जाणूनबुजून निशाणा साधला गेला आहे.

मुस्लिमांना निशाणा बनवण्यात येतंय- सिब्बल"माझं म्हणणं असं आहे की इतर राज्यातही असं होत आहे. जेव्हा धार्मिक मिरवणुका निघतात आणि दंगे होतात तेव्हा केवळ एकाच धर्माला टार्गेट करुन कारवाई केली जाते. केवळ एकाच समुदायाच्या घरांवर कारवाई केली जात आहे. सत्ताधारी राजकारणी न्यायाधीश होऊन काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवू लागले आहेत. हे काही राजकारणाचं व्यासपीठ नाही आणि देशात कायद्याचं राज्य आहे हे दाखवण्यासाठी न्यायालय आहे. विद्ध्ंवस थांबला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे", असं कपिल सिब्बल म्हणाले. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलdelhi violenceदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय