शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'नॉट पॉसिबल...', बुलडोजरबाबत कपिल सिब्बल यांनी केलेल्या अजब मागणीवर सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 14:26 IST

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं आणि त्यांचं म्हणणं फेटाळून लावलं. संपूर्ण देशात तोडक कारवाईत बुलडोजर वापरण्यात बंदी घालण्यात यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर केली. त्यावर सुप्रीम कोर्टानं ही मागणी तर्क संगत नाही आणि ती स्वीकारता येणं शक्य नाही, असं नमूद केलं आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईवर बंदी घालणं शक्य नाही आणि यासाठी बुलडोजरची गरज असते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 

दिल्लीच्या जहांगीरपुरीमधील अतिक्रमण हटवण्याच्या विरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आजही सुनावणी सुरू ठेवली आहे. काल कोर्टानं याप्रकरणी तातडीनं सुनावणी देत दिल्ली पालिकेनं कारवाई आहे त्या परिस्थितीत स्थगित करण्याचे आदेश दिले होते. कोर्टानं आज झालेल्या सुनावणीत तोडक कारवाईवरील स्थगिती पुढील दोन आठवड्यांसाठी वाढवली आणि पुढील सुनावणीपर्यंत जहांगीरपुरीमध्ये बुलडोजर चालवला जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी यावेळी इतर राज्यातही बुलडोजरच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं नकार दिला. 

कोर्टाच्या नकारानंतर कपिल सिब्बलही बॅकफूटवरकोर्टानं संपूर्ण देशात बुलडोजरच्या वापरावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर कबिल सिब्बलही बॅकफूटवर आले आणि त्यांनी आपलं म्हणणं विशेषत: जहांगीरपुरीबाबत असल्याचं सांगत सारवासारव केली. जेव्हा तोडक कारवाई केली जाईल तेव्हा बुलडोजरचा वापर केला जाऊ नये असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर कोर्टानं तोडफोड नेहमी बुलडोजरनेच केली जाते असं म्हटलं. पण प्रत्येक कारवाईत बुलडोजरची गरज नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. अतिक्रमण केवळ एक राज्यापूरतं मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण देशभरात आहे. जहांगीरपुरीचं उदाहरण देताना कपिल सिब्बल म्हणाले की याठिकाणी मुस्लिमांवर जाणूनबुजून निशाणा साधला गेला आहे.

मुस्लिमांना निशाणा बनवण्यात येतंय- सिब्बल"माझं म्हणणं असं आहे की इतर राज्यातही असं होत आहे. जेव्हा धार्मिक मिरवणुका निघतात आणि दंगे होतात तेव्हा केवळ एकाच धर्माला टार्गेट करुन कारवाई केली जाते. केवळ एकाच समुदायाच्या घरांवर कारवाई केली जात आहे. सत्ताधारी राजकारणी न्यायाधीश होऊन काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवू लागले आहेत. हे काही राजकारणाचं व्यासपीठ नाही आणि देशात कायद्याचं राज्य आहे हे दाखवण्यासाठी न्यायालय आहे. विद्ध्ंवस थांबला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे", असं कपिल सिब्बल म्हणाले. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलdelhi violenceदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय