शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Farmers Protest: “आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाने मोदी, योगी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 21:14 IST

Farmers Protest: एका याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे.

ठळक मुद्देअशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाहीआतापर्यंत सरकारला बराच वेळ मिळालाकेंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गेल्या जवळपास ८ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मोठ्या कालावधीपासून प्रचंड वाहतूक कोंडीला सामान्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे. आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा, अशी ताकीदही न्यायालयाने दिल्याचे सांगितले जात आहे. (supreme court ask centre govt of solution on blocked roads due to farmers protest)

“दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

शेतकरी आंदोलन आणि रस्ता बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी अर्धा तासाऐवजी दोन लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला सुनावत दोन आठवड्यात यावर तोडगा काढण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. 

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार

कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल, असे नमूद करत शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु, वाहतूक कोंडी करू शकत नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारनं यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, असे सांगत नोटीस बजावली आहे. आतापर्यंत सरकारला बराच वेळ मिळाला असून यावर समाधान शोधावे. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.

Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतेक आंदोलक वृद्ध असल्याचेही दाखवून देण्यात आले आहे. तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र ही चर्चा कोणत्याही अटींशिवाय व्हायला हवी. कायदे रद्द करा, या व्यतिरिक्त शेतकऱ्यांशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकारyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्ली