शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 06:47 IST

शेतीमालाच्या किमान किमतींत वाढ : लघू, मध्यम उद्योगांची व्याख्या व्यापक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी १४ खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्क्यांहून जास्त परतावा मिळेल अशा स्वरूपाची वाढ केली आहे. ही वाढ २०२०-२१ या वर्षासाठी आहे. भाताच्या किमतीत किरकोळ ५३ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ते ११६८ रुपये करण्यात आले आहे, तर तेलबिया, डाळी आणि भरड धान्ये यांच्या किमतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट ‘एमएसपी’ देण्याचा वादा लागोपाठ दुसऱ्या वर्षी पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला.नगदी पिकांमध्ये कापसाच्या किमान आधारभूत किमतीत मध्यम धाग्याच्या जातीच्या कापसाच्या किमतीत प्रतिक्विंटल २६० रुपये वाढ करून ती ५,५१५ करण्यात आली आहे, तर लांब धाग्याच्या कापसाच्या दरात २७५ रुपये वाढ करूनरण्यात येईल, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये करण्यात आली आहे. याचबरोबर सरकारने तीन लाख रुपयांचे कृषी आणि संबंधित कामासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या परतफेडीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने २०२०-२०२१ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. उत्पादन खर्चापेक्षा त्या ५० ते ८३ टक्के जादा परतावा देणाºया आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. याद्वारे केंद्र सरकारने २०१८-२०१९ मध्ये कृषिमालाला दीडपट भाव देण्याच्या केलेल्या घोषणेला अनुसरून या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.नाचणीच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल १४५ रुपये वाढ करून ती ३२९५ रुपये करण्यात आली आहे. मक्याची किंमत प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढवून ती १८५० करण्यात आली आहे. ज्वारीच्या दरात ७० रुपयांनी वाढ केल्यामुळे हायब्रीड ज्वारीची किंमत प्रतिक्विंटल २६२०, तर मालदंडी ज्वारीच्या २६४० रुपये झाली आहे. बाजरीचा दर १५० रुपये वाढ करून २१५० रुपये प्रतिकिवंटल करण्यात आला आहे. बाजरीच्या दरातील वाढ ही उत्पादन खर्चाच्या ८३ टक्के जादा आहे.उडीद दरात प्रतिक्विंटल ३०० रुपये वाढ करून ती सहा हजार करण्यात आली आहे, तर तुरीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ करून तोही प्रतिक्विंटल सहा हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. मूग दरात १४६ रुपये वाढ करून तो प्रतिक्विंटल ७१९६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.खाद्यतेलाच्या आयात कमी करण्यासाठी सरकारने तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत यंदा भरीव वाढ केली आहे. सोयाबीन (पिवळा) १७० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ३८८० रुपये, सुर्यफूल २३५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५८८५ रुपये तर भूईमूग १८५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५२७५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे, तर करडईच्या दरात ७५५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ६६९५ रुपये रुपये करण्यात आला आहे. तीळाच्या दरात ३७० रुपये वाढ करून तो ६८५५ रुपये करण्यात आला आहे.सरकारच्या म्हणण्यांनुसार शेतकऱ्यांना या १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. सर्वाधिक बाजरी ८३ टक्के, उडिद ६४ टक्के, मका ५३ टक्के तर उर्वरित पिकांना ५० टक्के जादा दर मिळणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी