शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 06:47 IST

शेतीमालाच्या किमान किमतींत वाढ : लघू, मध्यम उद्योगांची व्याख्या व्यापक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी १४ खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्क्यांहून जास्त परतावा मिळेल अशा स्वरूपाची वाढ केली आहे. ही वाढ २०२०-२१ या वर्षासाठी आहे. भाताच्या किमतीत किरकोळ ५३ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ते ११६८ रुपये करण्यात आले आहे, तर तेलबिया, डाळी आणि भरड धान्ये यांच्या किमतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट ‘एमएसपी’ देण्याचा वादा लागोपाठ दुसऱ्या वर्षी पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला.नगदी पिकांमध्ये कापसाच्या किमान आधारभूत किमतीत मध्यम धाग्याच्या जातीच्या कापसाच्या किमतीत प्रतिक्विंटल २६० रुपये वाढ करून ती ५,५१५ करण्यात आली आहे, तर लांब धाग्याच्या कापसाच्या दरात २७५ रुपये वाढ करूनरण्यात येईल, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये करण्यात आली आहे. याचबरोबर सरकारने तीन लाख रुपयांचे कृषी आणि संबंधित कामासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या परतफेडीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने २०२०-२०२१ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. उत्पादन खर्चापेक्षा त्या ५० ते ८३ टक्के जादा परतावा देणाºया आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. याद्वारे केंद्र सरकारने २०१८-२०१९ मध्ये कृषिमालाला दीडपट भाव देण्याच्या केलेल्या घोषणेला अनुसरून या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.नाचणीच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल १४५ रुपये वाढ करून ती ३२९५ रुपये करण्यात आली आहे. मक्याची किंमत प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढवून ती १८५० करण्यात आली आहे. ज्वारीच्या दरात ७० रुपयांनी वाढ केल्यामुळे हायब्रीड ज्वारीची किंमत प्रतिक्विंटल २६२०, तर मालदंडी ज्वारीच्या २६४० रुपये झाली आहे. बाजरीचा दर १५० रुपये वाढ करून २१५० रुपये प्रतिकिवंटल करण्यात आला आहे. बाजरीच्या दरातील वाढ ही उत्पादन खर्चाच्या ८३ टक्के जादा आहे.उडीद दरात प्रतिक्विंटल ३०० रुपये वाढ करून ती सहा हजार करण्यात आली आहे, तर तुरीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ करून तोही प्रतिक्विंटल सहा हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. मूग दरात १४६ रुपये वाढ करून तो प्रतिक्विंटल ७१९६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.खाद्यतेलाच्या आयात कमी करण्यासाठी सरकारने तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत यंदा भरीव वाढ केली आहे. सोयाबीन (पिवळा) १७० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ३८८० रुपये, सुर्यफूल २३५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५८८५ रुपये तर भूईमूग १८५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५२७५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे, तर करडईच्या दरात ७५५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ६६९५ रुपये रुपये करण्यात आला आहे. तीळाच्या दरात ३७० रुपये वाढ करून तो ६८५५ रुपये करण्यात आला आहे.सरकारच्या म्हणण्यांनुसार शेतकऱ्यांना या १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. सर्वाधिक बाजरी ८३ टक्के, उडिद ६४ टक्के, मका ५३ टक्के तर उर्वरित पिकांना ५० टक्के जादा दर मिळणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी