शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसच्या २ मोठ्या विजयांचा शिल्पकार लोकसभेच्या मैदानातून बाहेर; महाराष्ट्रावर फोकस करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:59 IST

सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

Lok Sabha Elections ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने देशभरातील विरोधी पक्षांची एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली असून या आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. पक्षाची प्रचारयंत्रणा किती ताकदीने राबवली जाते, यावर निवडणुकांमधील यश-अपयश अवलंबून असते. मात्र असं असताना काँग्रेसला एक धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार असलेल्या सुनील कनुगोलू यांनी लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा होणाऱ्या महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांवर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं पक्षाला कळवल्याची माहिती आहे.

काँग्रेसला कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशात पक्षाच्या नेत्यांसोबतच निवडणूक रणनीतीचं काम पाहणाऱ्या सुनील कनुगोलू यांचा मोठा वाटा राहिला आहे. याच कनुगोलू यांच्या टीमकडे काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची प्रचारयंत्रणा राबवण्याचं काम दिलं होतं. मात्र आपण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कनुगोलू यांनी आता पक्षाला सांगितले असल्याचे समजते. सुनील कनुगोलू हे काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारयंत्रणेचा भाग नसल्याने पक्षासाठी हा काही प्रमाणात धक्का आहे, असं मत काँग्रेसच्या एका राष्ट्रीय सचिवाने व्यक्त केलं आहे. याबाबत 'एनडीटीव्ही'ने वृत्त दिलं आहे.

एकीकडे, आपल्या कुशल निवडणूक रणनीतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांची २०२२ मध्ये काँग्रेससोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटली होती. पक्षात आपली भूमिका नक्की काय असणार, याबाबत काँग्रेस नेतृत्त्वासोबत मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी काँग्रससोबत येण्यास नकार दिला. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांच्याच तालमीत तयार झालेल्या आणि काँग्रेसच्या दोन मोठ्या विजयांचे शिल्पकार ठरलेले सुनील कनुगोलू हेदेखील काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेत काम करणार नसल्याने काँग्रेससमोरचे आव्हान आणखीनच कठीण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुनील कनुगोलू हे काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीत काम करणार नसले तरी महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काम करणार असल्याने राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्र