शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

सरकारी नोकरदाराची अशीही फसवणूक; चहासाठी बोलवले अन् बळजबरीने लावले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:44 IST

मुलीच्या कुटुंबीयांनी स्वत:हून मुलीला परीक्षा देण्याच्या कारणास्तव मुलाकडे पाठवले होते

पाटणा - मुलगी पाहायला आले अन् लग्नच उरकून गेले किंवा साखरपुड्यातच उरकला विवाहसोहळा अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. समाजातून अशा घटनांचं कौतुकही झालं आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने होणारे लग्न चर्चेचा आणि विचाराधीनतेचा मुद्दा बनतो. मात्र, बिहारमध्ये पकडौआ विवाह करण्यात आला असून चहा पिण्यासाठी निमंत्रण देऊन जबरदस्तीने विवाह लावण्याचा प्रकार घडला आहे. मुलीच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी महसूल खात्यातील सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिला होता. मात्र, आत्ताच लग्न करायचं नसल्याचे सांगतिल्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घडना समोर आली आहे. 

मुलीच्या कुटुंबीयांनी स्वत:हून मुलीला परीक्षा देण्याच्या कारणास्तव मुलाकडे पाठवले होते. त्यानंतर, मुलीचे अपहरण झाल्याची पोलीस तक्रार देण्यात आली. त्यामुळे, मुलगा संबंधित मुलीसोबत पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी, कुटुंबीयांनी जवळील एका मंदिरात दोघांचा विवाह लावून दिला. एकदम फिल्मीस्टाईल लग्नाच्या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून पोलीस खात्यावरही संशय निर्माण झाला आहे. कारण, या लग्नसोहळ्याला मुलाच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते, तरीही पोलिसांच्या उपस्थितीत हा विवाह कसा पार पडला. 

छौडाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पतला गावातील निवासाही शाम नारायण महतो यांच्या मुलाबाबतीत ही घटना घडली आहे. मुलगा रिंटू कुमार सितामढी जिल्ह्याच्या कार्यालयात महसूल कर्मचारी आहे. दोन महिन्यांपूर्वी खदियाही गावातील रहिवाशी जागेश्वर प्रसाद यांनी त्यांची कन्या राणी चंद्रप्रभाच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महूसल कर्मचारी असलेल्या मुलाने तुर्तास लग्न करण्यास नकार दिला होता. 

शाम महतो यांनी सांगितले की, आमचा मुलगा एक महिन्यापूर्वी गावाकडे आला होता. त्यावेळी, मुलीच्या संबंधित नातेवाईकाने मुलीलाही तिकडेच बोलावून घेतले होते. त्यामुळे चहा पिण्यासाठी महसूल कर्मचारी मुलाला निमंत्रण दिले. त्यानुसार, मुलगा घरी आला आणि मुलीच्या हाताने बनविलेला चहा पिला. त्यानंतर, संबंधित नातेवाईकाने एकाची परीक्षा असल्याने तुमच्या रुमवर एक दिवसासाठी त्यांस ठेवावे, अशी विनंती मुलाकडे केली. मात्र, परीक्षा देण्याचं कारण सांगून आलेली ती व्यक्ती चंद्रप्रभा हीच होती. त्यामुळे, मुलालाही आश्चर्य वाटले. इकडे मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत, मुलीला लग्नाच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले. त्यामुळे, चांगलाच गोंधळ उडाला होता. 

विभूतीपूर पोलिस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांच्या आग्रहास्तव मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून देण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना कट रचून हे लग्न केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दरम्यान, या लग्नप्रक्रियेत पोलिसांची भूमिकाही संशयात भोवऱ्यात आहे.    

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीjobनोकरीGovernmentसरकारPoliceपोलिस