शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

अग्नि ५ क्षेपणास्त्राची रेंज चीनपासून तुर्कीपर्यंत; आशियापासून अर्धा युरोप भारताच्या आवाक्यात, ५० टन वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:42 IST

अग्नि ५ क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते

Agni 5 Missile Test: भारताने बुधवारी स्वदेशी बनावटीच्या अग्नि-५ इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अग्नि-५ च्या यशस्वी चाचणीमुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत झाली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजवरून करण्यात आली. हे भारताची सामरिक शक्ती वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आणि या चाचणीत सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबी यशस्वी झाल्या.

अग्नि-५  हे भारताचे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, जे म्हणजेच मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलने सुसज्ज आहे. याचा अर्थ असा की अग्नि ५ क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक पारंपारिक आणि अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. हे सर्व वॉरहेड्स स्वतंत्रपणे वेगवेगळ्या लक्ष्यांना लक्ष्य करू शकतात. अग्नि ५ क्षेपणास्त्राच्या या चाचणीमुळे भारताची सामरिक क्षमता वाढली आहे. आतापर्यंत जगातील काही मोजक्याच देशांकडे अग्नि-५ सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, जी मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलने तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

अग्नि ५ क्षेपणास्त्राची रेंज ५००० किलोमीटरपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये चीन ते तुर्की यांचा समावेश आहे. हे क्षेपणास्त्र केवळ संपूर्ण आशियाच नाही तर अर्ध्या युरोप आणि आफ्रिकन खंडालाही लक्ष्य करू शकते. हे तीन टप्प्यांचे घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे, जे १७ मीटर लांब आणि २ मीटर रुंद आहे. त्याचे वजन सुमारे ५० टन आहे आणि ते १.५ टन पर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेपणास्त्राची चाचणी भारताच्या महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांचे नेतृत्व करणाऱ्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने केली आहे. ही कमांड भारताच्या क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेपासून आणि हल्ल्याच्या नियोजनापर्यंत सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहे.

एमआयआरव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने, एक देश एकाच क्षेपणास्त्राने शेकडो किलोमीटर अंतरावरील अनेक लक्ष्यांवर लक्ष्य करू शकतो. सेंटर फोर आर्म्स कंट्रोल अँड नॉन प्रोलिफेरेशनच्या मते हे तंत्रज्ञान विकसित करणे खूप कठीण आहे. म्हणूनच अनेक शक्तिशाली देशांकडेही हे तंत्रज्ञान नाही. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, लहान वॉरहेड्स, लक्ष्यांवर अचूकपणे मारा करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि त्यांना वेगवेगळ्या लक्ष्यांवर सोडण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे.

आतापर्यंत ल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञान फक्त रशिया, चीन, अमेरिका, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमसह निवडक देशांमध्येच आहे. इस्रायलकडेही असे तंत्रज्ञान असल्याचे म्हटले जाते, पण त्यांनी याला दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारलेला नाही. पाकिस्तान देखील एमआयआरव्ही तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहे. एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज क्षेपणास्त्रे जमिनीवरून किंवा पाणबुडीवरून सोडता येतात. 

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवान