शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! 3 वेळा नापास झाल्यावर सोडली होती आशा पण कुटुंबाने साथ दिली अन् 'ती' झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:24 IST

IAS Pujya Priyadarshini : तीन वेळा अपयश आले. त्यानंतर आशा सोडली. हा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र घरच्यांच्या पाठिंब्याने त्यांनी आणखी एक प्रयत्न केला.

2018 च्या UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक 11 मिळवणाऱ्या IAS अधिकारी पूज्य प्रियदर्शिनी यांची (IAS Pujya Priyadarshini) गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. त्यांना तीन वेळा अपयश आले आणि त्यानंतर त्यांनी आशा सोडली. हा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरच्यांच्या पाठिंब्याने त्यांनी आणखी एक प्रयत्न केला. यावेळी त्याचे नशीब चमकले आणि त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

पूज्य प्रियदर्शिनी यांनी दिल्लीतून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली. त्यानंतर सुमारे दोन वर्षे एका कंपनीत काम केले. याच दरम्यान, त्या यूपीएससीची तयारी करत होत्या.

UPSC सक्सेस स्टोरी

पूज्य प्रियदर्शिनी 2013 मध्ये पहिल्यांदा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसल्या, पण त्या नापास झाल्या. त्यानंतर चांगल्या तयारीसाठी त्यांनी 3 वर्षांचा गॅप घेतला आणि 2016 मध्ये दुसरा प्रयत्न केला. यावेळी त्या मुलाखत फेरीपर्यंत पोहोचल्या, पण तिथे नाव अंतिम यादीत आले नाही. निराश होण्याऐवजी त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरवले.

"कुटुंबीयांनी साथ दिली"

2017 मध्ये पूर्वपरीक्षेत यश मिळवण्याच्या इतक्या जवळ आल्यानंतर आणि तरीही नापास झाल्यानंतर, मनाला निराशेने ग्रासले. यानंतर त्यांनी यूपीएससीसाठी प्रयत्न करणे थांबवण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात त्याच्या कुटुंबीयांनी त्याला साथ दिली आणि त्याला आणखी एक प्रयत्न करण्यास तयार केले. यावेळी, स्ट्रेटजी कामाला आली आणि त्यांना यश मिळालं.

"नापास झालो तरी घाबरण्याची गरज नाही"

पूज्य प्रियदर्शिनी UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कठोर परिश्रम आणि संयम बाळगण्याचा सल्ला देतात. परीक्षेची तयारी चांगली करावी आणि नापास झालो तरी घाबरण्याची गरज नाही, असे त्यांचे मत आहे. तुमच्या चुका सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही कठोर परिश्रमाने UPSC ची तयारी केलीत तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"