शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कर्नाटकात पुन्हा रंगणार सत्तेचं 'नाटक'?; भाजपा आमदार काय म्हणतोय बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 09:29 IST

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यमंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या हालचालींना वेग आला आहे.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी चांगलाचा राजकीय तमाशा पाहिला मिळाला होता. कर्नाटकात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. मात्र, केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. तर, सर्वात कमी जागा असतानाही जेडीएसच्या कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. मात्र, आता पुन्हा कर्नाटकमध्ये सत्तेच नाटक रंगणार असल्याचं दिसतंय.  

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यमंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या हालचालींना वेग आला आहे. येथील काँग्रेस अन् जेडीएसचे काही आमदार नाराज आहेत. त्यातच, भाजपा आमदार उमेश कट्टी यांच्या विधानामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील राजकीय वातावरण गढूळ बनल्याचं कट्टी यांच्या विधानानंतर लक्षात येईल. काँग्रेस-जेडीएस पक्षातील 15 नाराज आमदारांच्या मी संपर्कात आहे. जर, ते भाजपात येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत, असे कट्टी यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. उमेश कट्टी हे कट्टर भाजपा समर्थक असून ते 8 वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार बनून निवडणूक आले आहेत. 

कर्नाटकात पुढील आठवड्यात भाजपा सत्ता स्थापन केरल, असा दावा कट्टी यांनी केला आहे. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळले आहे. भाजपा कुठल्याही काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काँग्रेसनेही उमेश यांचा दावा फेटाळत या काल्पनिक बाबी असल्याचं म्हटलंय. दरम्यान, शनिवारी कुमारस्वामी मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रीपद काढून घेण्यात आलेले आमदार पक्षावर नाराज असून काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसMLAआमदार