शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिंताजनक! शाळेत प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्याला हार्ट अटॅक; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:03 IST

आरोग्याची काळजी न घेणे बेततेय जिवावर

नवी दिल्ली - २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाल्याने आता वयाच्या केवळ १७व्या वर्षी दहावीतील विद्यार्थ्यांचा शाळेत प्रार्थना सुरू असतानाच हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाला. अनियमित दिनचर्या आणि आपण जे दररोज बाहेरील अन्नपदार्थ खातो, त्यामुळे हृदयविकाराला आमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एका अभ्यासानुसार, भारतात ३ कोटींहून अधिक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रासले आहेत. भारतात दर ३ सेकंदाला एका व्यक्तिचा हृदयविकाराने मृत्यू होत आहे. यामध्ये ५० टक्के लोक ५० वर्षांवरील आहेत. २५ टक्के लोक ४० वर्षांचे आहेत, तर यापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्याही वाढत आहे.

हार्ट अटॅकच्या काही घटनातेलंगणातील खम्मम जिल्ह्यात सोमवारी ३१ वर्षीय तरुणाचा जिमनंतर मृत्यू झाला. खम्मममध्ये रविवारी ३३ वर्षीय नागराजू यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात तेलंगणातील जगतियालमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तिचा मृत्यूआंध्र प्रदेशातील बापटला येथे मार्च महिन्यात एका शाळेतील शिक्षकाचा मुलांना शिकवताना हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये, बॅडमिंटन खेळताना २८ वर्षीय व्यक्तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. २५ फेब्रुवारी रोजी एका १९ वर्षीय मुलाचा लग्नात डान्स करताना मृत्यू झाला होता. जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. हळदी समारंभात एका तरुणाला चक्कर आली आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता.

नशेमुळे हृदयाचे मायकार्डियल स्नायू कमकुवत होऊ लागतात. या स्नायूंपासूनच हृदय तयार होते. या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे, हृदयाच्या ठोक्याचा वेग असामान्य होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हार्ट अटॅकची प्रमुख कारणे...धूम्रपान करणे, जंकफूडचे सेवन करणे, मद्यपानामुळे वाढते ब्लडप्रेशर, जास्त काम, सतत तणाव

१८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण सिगारेट आणि दारूचे सेवन करू लागले आहेत, जे हृदयविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भोपाळमध्ये एका १७ वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Healthआरोग्य