शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 09:33 IST

राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

लखनौ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दोघांना ''तुम्ही लग्न कधी करणार?'', या प्रश्नाला वारंवार सामोरं जावं लागतं. अशातच, राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल गांधी आणि अदिती सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे या दोघांचं लग्न होणार असल्याचा दावा काही जण सोशल मीडियावर करत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, अदिती सिंह आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य दिसत आहेत. 'राहुल गांधींना अखेर जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत' असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

मात्र दुसरीकडे, राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंह यांनी खंडन केलं आहे.  याबाबत अदिती सिंह म्हणाल्या आहेत की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे मी प्रचंड हैराण झाले आहे. राहुल गांधी केवळ आमच्या पार्टीचे अध्यक्ष नाहीत, तर माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे लग्नासंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे सांगत अदिती सिंह यांनी अफवेबाबत खुलासा केला आहे. 

'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंह यांनी विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.

(जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?)

वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. यापूर्वी बॉक्सर विजेंदर सिगनं एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना सर्वांसमोरच लग्नासंबंधीचा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. विजेंदर सिंग लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे, जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्न होईल'.  नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमादरम्यान विजेंदरनं राहुल गांधींना हा प्रश्न विचारला. यापूर्वीदेखील एका कार्यक्रमात जेव्हा राहुल गांधी यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते की, 'जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करणार'.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल