शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 07:34 IST

अयोध्या निकालाआधी निर्णय : लोकांनी घरी केला अन्नधान्याचा साठा

अयोध्या : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार असताना त्या जागेवर बांधावयाच्या श्रीराम मंदिरासाठी दगड व संगमरवरावर कोरीव काम करण्याचे गेली ३० वर्षे अव्याहतपणे सुरू असलेले काम अचानकपणे थांबविण्यात आले आहे.

राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरासाठी वापरावयाच्या दगडांवर नक्षी कोरण्याचे काम सध्या थांबविण्यात आले आहे.हे काम थांबविण्याचे नेमके कारण शर्मा यांनी स्पष्ट केले नाही. मात्र काम केव्हा पुन्हा सुरू करायचे हे नंतर ठरविले जाईल, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘विहिंप’चे अन्य नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.काम थांबल्याने त्यासाठी मुद्दाम आणण्यात आलेले कुशल कारागीर गुजरातमध्ये सौराष्ट्र व भूजमध्ये आपापल्या गावी परत गेले आहेत. मात्र येणारे भाविक व पर्यटक यांच्याकडून ऐच्छिक वर्गणी घेण्यासाठी कारसेवकपुरममधील काऊंटर अजूनही सुरू आहेत. १९९० मध्ये उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री असतानापासून वादग्रस्त जागेच्या जवळच असलेल्या कारसेवकपुरम येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत दगडांचे कोरीव काम अव्याहतपणे सुरू होते. आतापर्यंत १.२५ लाख घनफूट दगडांचे कोरीव काम झाल्याचे ‘विहिंप’चे म्हणणे आहे.निकालानंतर काय परिस्थिती उद््भवेल या चिंतेने अयोध्येतील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक दिवस पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी कुटुंबातील महिला व मुलांना अन्यत्र हलविले आहे.मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करू नयेत : पंतप्रधानच्रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करणे टाळावे, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.च्या निकालाच्या आधी व नंतर सामाजिक सलोखा कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.च्खटल्याच्या निकालानंतर कोणीही जल्लोष किंवा निदर्शने करू नये, असे आवाहन माजी सॉलिसिटर जनरल एन. संतोष हेगडे यांनी केले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी