शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 07:34 IST

अयोध्या निकालाआधी निर्णय : लोकांनी घरी केला अन्नधान्याचा साठा

अयोध्या : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार असताना त्या जागेवर बांधावयाच्या श्रीराम मंदिरासाठी दगड व संगमरवरावर कोरीव काम करण्याचे गेली ३० वर्षे अव्याहतपणे सुरू असलेले काम अचानकपणे थांबविण्यात आले आहे.

राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरासाठी वापरावयाच्या दगडांवर नक्षी कोरण्याचे काम सध्या थांबविण्यात आले आहे.हे काम थांबविण्याचे नेमके कारण शर्मा यांनी स्पष्ट केले नाही. मात्र काम केव्हा पुन्हा सुरू करायचे हे नंतर ठरविले जाईल, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘विहिंप’चे अन्य नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.काम थांबल्याने त्यासाठी मुद्दाम आणण्यात आलेले कुशल कारागीर गुजरातमध्ये सौराष्ट्र व भूजमध्ये आपापल्या गावी परत गेले आहेत. मात्र येणारे भाविक व पर्यटक यांच्याकडून ऐच्छिक वर्गणी घेण्यासाठी कारसेवकपुरममधील काऊंटर अजूनही सुरू आहेत. १९९० मध्ये उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री असतानापासून वादग्रस्त जागेच्या जवळच असलेल्या कारसेवकपुरम येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत दगडांचे कोरीव काम अव्याहतपणे सुरू होते. आतापर्यंत १.२५ लाख घनफूट दगडांचे कोरीव काम झाल्याचे ‘विहिंप’चे म्हणणे आहे.निकालानंतर काय परिस्थिती उद््भवेल या चिंतेने अयोध्येतील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक दिवस पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी कुटुंबातील महिला व मुलांना अन्यत्र हलविले आहे.मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करू नयेत : पंतप्रधानच्रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करणे टाळावे, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.च्या निकालाच्या आधी व नंतर सामाजिक सलोखा कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.च्खटल्याच्या निकालानंतर कोणीही जल्लोष किंवा निदर्शने करू नये, असे आवाहन माजी सॉलिसिटर जनरल एन. संतोष हेगडे यांनी केले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी