शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

राज्यांना नागरिकत्व कायदा नाकारण्याचा अधिकार नाही, केंद्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 9:28 PM

राज्य सरकारांना नागरिकत्व संशोधन अधिनियम 2019ला नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका उच्च अधिकाऱ्यानं केला आहे.

नवी दिल्लीः राज्य सरकारांना नागरिकत्व संशोधन अधिनियम 2019ला नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका उच्च अधिकाऱ्यानं केला आहे. घटनेच्या 7व्या अनुच्छेदामध्ये यासंदर्भात स्पष्ट करण्यात आल्याचाही त्या अधिकाऱ्यानं हवाला दिला आहे. राज्य सरकारांकडे हा कायदा नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही. पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी नागरिकत्व कायद्याला असंविधानिक असल्याचं सांगितलं होतं, त्यादरम्यान या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, केंद्रीय कायद्याच्या चौकटीत येणारा प्रत्येक कायदा हा राज्य सरकारांना लागू करावाच लागतो, तो त्यांना नाकारता येत नाही. घटनेच्या 7व्या अनुच्छेदानुसार 97 गोष्टी येतात. संरक्षण, बाहेरची प्रकरणं, रेल्वे, नागरिकता अशा मुद्द्यांचा त्यात समावेश होतो. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, असंवैधानिक कायद्याला आमच्या राज्यात कोणतंही स्थान नाही.तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, जाहीरनाम्यात विकासाच्या मुद्द्यांऐवजी तुम्ही देशाचं विभाजन करण्याचा उल्लेख केलेला आहे काय?, नागरिकत्व मिळण्यासाठी धर्माचा आधार कशासाठी पाहिजे?, मी याचा स्वीकार करणार नाही. मी या कायद्याला आव्हान देते. तुमच्याकडे आकडे असल्यामुळेच ते लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेऊ शकतात. पण आम्ही तुम्हाला देशाचं विभाजन करू देणार नाही. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा आहे. पंजाबमध्येही हा कायदा लागू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर छत्तीसगडनंही हा कायदा लागू न करण्याचा निर्धार केला आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक