शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 11:04 IST

सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

ठळक मुद्देपरमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्याचा तपास करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला खीळ बसावी, त्यात तपास यंत्रणेला अपयश यावे, यासाठी राज्य सरकार ‘निर्लज्जपणे’ प्रयत्न करत आहे. त्यामुळे या याचिकेद्वारे दिलासा मिळविण्यास राज्य सरकार पात्र नाही, असे सीबीआयने उच्च न्यायालयात बुधवारी म्हटले.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासप्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेत राज्य सरकारला कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देऊ नये, अशी मागणी सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अमन लेखी यांनी केली.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्याचा तपास करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते. मात्र, तसे न करता त्यांनी सीबीआयच्या एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी याचिका दाखल केली. सुरुवातीपासूनच राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करण्याबाबत उदासीन होते. त्यांनी केवळ देशमुख यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे हा तपास उच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केला, असा युक्तिवाद लेखी यांनी न्यायालयात केला. 

nतसेच राज्य सरकारने राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक व सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर केलेल्या आरोपांवरही लेखी यांनी आक्षेप घेतला. देशमुख यांच्या कार्यकाळात जयस्वाल पोलीस महासंचालक होते.  पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्यांबाबत घेतलेल्या निर्णयात तेही पोलीस महासंचालक या नात्याने सहभागी होते. त्यामुळे या तपासात त्यांचीही चौकशी करायला हवी. तेव्हाच तपास पारदर्शी आणि निष्पक्षपणे केल्यासारखे होईल, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी केला.nत्यावर लेखी यांनी युक्तिवाद केला की, राज्य सरकार जयस्वाल यांना ‘लक्ष्य’ करत आहे. जयस्वाल यांनी पोलीस दलातील नियुक्त्या व बदल्यांच्या तपाससंदर्भात सरकारला पत्र लिहिले. एका नैतिक पोलीस अधिकाऱ्याकडून जे अपेक्षित होते, तेच त्यांनी केले. ते जर स्वत: दोषी असते तर त्यांनी पत्र का लिहिले असते?. न्यायालयाने यावर पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला ठेवली आहे.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग