शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 11:04 IST

सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

ठळक मुद्देपरमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्याचा तपास करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला खीळ बसावी, त्यात तपास यंत्रणेला अपयश यावे, यासाठी राज्य सरकार ‘निर्लज्जपणे’ प्रयत्न करत आहे. त्यामुळे या याचिकेद्वारे दिलासा मिळविण्यास राज्य सरकार पात्र नाही, असे सीबीआयने उच्च न्यायालयात बुधवारी म्हटले.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासप्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेत राज्य सरकारला कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देऊ नये, अशी मागणी सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अमन लेखी यांनी केली.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्याचा तपास करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते. मात्र, तसे न करता त्यांनी सीबीआयच्या एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी याचिका दाखल केली. सुरुवातीपासूनच राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करण्याबाबत उदासीन होते. त्यांनी केवळ देशमुख यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे हा तपास उच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केला, असा युक्तिवाद लेखी यांनी न्यायालयात केला. 

nतसेच राज्य सरकारने राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक व सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर केलेल्या आरोपांवरही लेखी यांनी आक्षेप घेतला. देशमुख यांच्या कार्यकाळात जयस्वाल पोलीस महासंचालक होते.  पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्यांबाबत घेतलेल्या निर्णयात तेही पोलीस महासंचालक या नात्याने सहभागी होते. त्यामुळे या तपासात त्यांचीही चौकशी करायला हवी. तेव्हाच तपास पारदर्शी आणि निष्पक्षपणे केल्यासारखे होईल, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी केला.nत्यावर लेखी यांनी युक्तिवाद केला की, राज्य सरकार जयस्वाल यांना ‘लक्ष्य’ करत आहे. जयस्वाल यांनी पोलीस दलातील नियुक्त्या व बदल्यांच्या तपाससंदर्भात सरकारला पत्र लिहिले. एका नैतिक पोलीस अधिकाऱ्याकडून जे अपेक्षित होते, तेच त्यांनी केले. ते जर स्वत: दोषी असते तर त्यांनी पत्र का लिहिले असते?. न्यायालयाने यावर पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला ठेवली आहे.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग