शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

"अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार; लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 07:01 IST

लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल

नवी दिल्ली : मंदीसदृश अर्थव्यवस्थेचे कंबरडे कोरोनामुळे मोडले असतानाच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे. राजन यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात की, अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला आहे. अजून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर व्हायचा आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था आणखी बिकट होऊ शकेल. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोपर्यंत फारसा खर्च करता येणार नाही, असेही यांनी म्हटले आहे.

कोरोनाकाळात सरकारने केलेली मदत पुरेशी नाही. भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी सरकार आज संसाधने वाचवू पाहत आहे. सरकारची ही रणनीती आत्मघाती आहे. कोरोना नियंत्रणात आल्यावर दिलासा देऊ, पॅकेज जाहीर करू, असा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजल्याचे दिसत नाही. या मार्गाने गेल्यास पॅकेज जाहीर होईपर्यंत अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान झालेले असेल, असे राजन यांनी म्हटले आहे.

सातत्यपूर्ण उपचारांची गरज

राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करून परिस्थितीवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्था एखादा रुग्ण असल्याची कल्पना केल्यास त्या रुग्णाला सातत्याने उपचारांची आवश्यकता असते. दिलासा न मिळाल्यास लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. ते मुलांना शिकवू शकणार नाहीत. मुलांवर काम करण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येईल. कर्जासाठी लोकांना त्यांच्याकडे असणारे सोने गहाण ठेवावे लागेल. ईएमआय, घरभाडं देणे कठीण होईल. लहान कंपन्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. या कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल आणि त्या बंद होतील. अशा प्रकारे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल, असा इशारा राजन यांनी दिला आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाRaghuram Rajanरघुराम राजनIndiaभारत