शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:55 IST

SRS report : SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे सरासरी वय केवळ 32 वर्षे होते. अर्थात तेव्हा भारतीय लोक सरासरी केवळ 32 वर्षांपर्यंतच जगू शकत होते. मात्र, आता हे सरासरी वय 69 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या सरासरी वयात दुप्पट पेक्षाही अधिक वाढ झाली आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टमच्या (SRS) नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मात्र, असे असले तरी जागतिक सरासरीचा विचार करता हे अद्यापही कमीच आहे. जगातील सरासरी वय 72 वर्षे 6 महिने एवढे आहे.

SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, पुरुषांच्या तुलनेत महिला अडीच वर्षे अधिक जगतात. देशातील पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे 4 महिने आहे, तर महिलांचे सरासरी वय 71 वर्षे 1 महिना एवढे आहे, असेही या अहवालातून समोर आले आहे. 

याच बरोबर, शहरी लोकांचे वय ग्रामीण लोकांच्या तुलनेत अधिक आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय 73 वर्षे आहे, तर खेड्यात राहणाऱ्यांचे वय 68 वर्षे 3 महिने आहे, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.

दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त, छत्तीसगडमधील लोकांचे सर्वात कमी - या अहवालानुसार दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त आहे. येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 9 महिने आहे. तर सर्वात कमी सरासरी वय छत्तीसगडमधील लोकांचे आहे, येथील लोक 65 वर्षे आणि 3 महिने जगू शकतात. दिल्लीपाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो, येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 2 महिने एवढे आहे. तर महाराष्ट्रातील लोकांचे सरासरी वय 72.7 वर्ष एवढे सांगण्यात आले आहे. यातही पुरुषांचे सरासरी वय 71.6 तर महिलांचे सरासरी वय 74.0 एवढे सांगण्यात आले आहे. 

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर आपण किती वर्षांपर्यंत जगू शकता - ?या अहवालात भारतामध्ये एक ठरावीक वय पार केल्यानंतर, आणखी किती वर्षांपर्यंत जगता येऊ शकते, याचाही अंदाज लावण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जन्माच्या वेळी तुमचे सरासरी वय 69 वर्षे 7 महिने आहे. मात्र, जर वयाचे 1 वर्ष पूर्ण झाले तर आणखी 71.3 वर्षे जगू शकतात. वयाचे 5 वर्षे पूर्ण झाली तर आणखी 67.7 वर्षे अधिक जगू शकता.

याच प्रमाणे, वयाची 10 वर्षे पार केल्यानंतर आणखी 62.9 वर्षे जगू शकतात. 20 वर्षांच्या वयानंतर आणखी 53.3 वर्षांपर्यंत जगू शकता. वयचे 30 वर्ष ओलांडल्यानंतर, आणखी 43.9 वर्षे जगू शकता. 40 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 34.7 वर्षे जगता येईल, वयाची 50 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 26 वर्षे गता येईल, वयाची साठी ओलांडल्यानंतर, आणखी 18.3 वर्षे आणि 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणखी नंतर 11.8 वर्षे जगता येऊ शकते.

टॅग्स :IndiaभारतWomenमहिलाHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीChhattisgarhछत्तीसगडKeralaकेरळ