शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

भारत- श्रीलंका तणावामुळे श्रीलकंन क्रिकेट टीम मायदेशी परतली

By admin | Updated: August 4, 2014 12:36 IST

श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारताविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर श्रीलंकेच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघाला मायेदशी परत पाठवण्यात आले आहे.

ऑनलाइन टीम

चेन्नई, दि. ४ - सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघाला मायेदशी परत पाठवण्यात आले आहे. हा संघ चेन्नईतील जेएम हारून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवारी रात्री शहरात दाखल झाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ही स्पर्धा खेळण्यास मनाई करण्यात आली व मायदेशी परत पाठवण्यात आले. 
श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारत, तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर चेन्नई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मच्छिमारांच्या प्रश्नावरून अनेक पत्रे लिहिली आहेत. या पत्रांचा उल्लेख करताना श्रीलंकेच्या वेबसाईटवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत या नेत्यांबाबत टिप्पणी करण्यात आली होती. यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघाला परत पाठवण्यात आले. 
दरम्यान श्रीलंकेच्या स्पोर्ट्स टीमला चेन्नईवरून परत पाठवण्यात आल्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी २०१२ साली जयललिता यांनी श्रीलंकेच्या फूटबॉल संघाला परत जाण्यास सांगितले होते.