शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

वाहन परवाना देताना सरकारने घ्यावी विशेष काळजी- नरेन कार्तिकेयन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 01:30 IST

देशाचा पहिला एफवन रेसर याने रस्ते अपघातांविषयी व्यक्त केली चिंता

- रोहित नाईक मुंबई : ‘भारत जगामध्ये रस्ते अपघातांमध्ये आघाडीवर आहे. मोटरस्पोर्ट रेसिंगच्या तुलनेत रस्ते अपघात अधिक धोकादायक असल्याने हे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय सरकारने वाहन चालक परवाना देताना विशेष काळजी घेत चालक चाचणी अधिक कठोर करावी,’ असा सल्ला भारताचा पहिला फॉर्म्युला वन (एफवन) रेसर नरेन कार्तिकेयन याने ‘लोकमत’शी बोलताना दिला.गुरुवारी मुंबईत बीकेसी एमएमआरडीए मैदानात आॅटोकार परफॉर्मन्स शोचे उद्घाटन कार्तिकेयनच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्याने ‘लोकमत’सह संवाद साधताना म्हटले की, ‘आज वाहन परवाना मिळविणे खूप सोपे झाले आहे. अनेक तरुण विनाकारण रहदारीच्या रस्त्यांवर वेगाने वाहने पळवितात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारने परवाना देताना कठोर चाचणी प्रक्रिया घ्यायला पाहिजे. वाहने चालविताना मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लघन होते. वाहने वेगवान होत आहेत, रस्ते सुधारत आहेत. आपले राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे होत आहेत, पण ही सुधारणा होत असताना वाहन चालविण्याचे कौशल्य मात्र सुधारत नाही. त्यामुळेच आपल्याला सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवावे लागतील. विविध चाचण्या केल्यानंतरच सरकारने तरुणांना वाहन परवाना दिला पाहिजे. यामुळे अधिक सुरक्षित व जबाबदार चालक निर्माण होतील.’कार्तिकेयनने पुढे म्हटले की, ‘आपल्याकडे सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले जात नाही, जे खूप गंभीर आहे. कोणतेही वाहन चालविताना सुरक्षितता महत्त्वाची असते. भविष्यात बाइक, कार आणखी वाढतील. त्यामुळेच पुरेपूर सुरक्षितता बाळगून वाहन चालविणेच योग्य राहील. विशेष करून तरुणांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी.’भारतीय युवा रेसर्सविषयी कार्तिकेयनने म्हटले की, ‘आज एफ वनच्या दिशेने अनेक भारतीय खेळाडू वेगाने आगेकूच करीत आहेत. अर्जुन सैनीसह अनेक खेळाडू चमकत आहेत. या तरुणांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. त्यामुळेच पुढच्या वर्षी नक्कीच युरोपियन स्तराच्या फॉर्म्युला थ्रीमध्ये भारतीय चालकांचा सहभाग पाहण्यास मिळेल. अधिकाधिक रेस करून युवा भारतीयांना अनुभव मिळेल आणि त्यातूनच ते प्रगती करतील.’रेसिंगचे उज्ज्वल भविष्यभारतात नोएडा येथे रेसिंगसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय येत्या काही वर्षांत भारतात आणखी रेसिंग ट्रॅक निर्माण होतील. त्यामुळे भारतीय रेसिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. आज भारत क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही चमकत आहे. त्यामुळेच भारताची क्रीडादेश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.- नरेन कार्तिकेयन

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात