शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

वाहन परवाना देताना सरकारने घ्यावी विशेष काळजी- नरेन कार्तिकेयन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 01:30 IST

देशाचा पहिला एफवन रेसर याने रस्ते अपघातांविषयी व्यक्त केली चिंता

- रोहित नाईक मुंबई : ‘भारत जगामध्ये रस्ते अपघातांमध्ये आघाडीवर आहे. मोटरस्पोर्ट रेसिंगच्या तुलनेत रस्ते अपघात अधिक धोकादायक असल्याने हे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय सरकारने वाहन चालक परवाना देताना विशेष काळजी घेत चालक चाचणी अधिक कठोर करावी,’ असा सल्ला भारताचा पहिला फॉर्म्युला वन (एफवन) रेसर नरेन कार्तिकेयन याने ‘लोकमत’शी बोलताना दिला.गुरुवारी मुंबईत बीकेसी एमएमआरडीए मैदानात आॅटोकार परफॉर्मन्स शोचे उद्घाटन कार्तिकेयनच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्याने ‘लोकमत’सह संवाद साधताना म्हटले की, ‘आज वाहन परवाना मिळविणे खूप सोपे झाले आहे. अनेक तरुण विनाकारण रहदारीच्या रस्त्यांवर वेगाने वाहने पळवितात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारने परवाना देताना कठोर चाचणी प्रक्रिया घ्यायला पाहिजे. वाहने चालविताना मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लघन होते. वाहने वेगवान होत आहेत, रस्ते सुधारत आहेत. आपले राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे होत आहेत, पण ही सुधारणा होत असताना वाहन चालविण्याचे कौशल्य मात्र सुधारत नाही. त्यामुळेच आपल्याला सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवावे लागतील. विविध चाचण्या केल्यानंतरच सरकारने तरुणांना वाहन परवाना दिला पाहिजे. यामुळे अधिक सुरक्षित व जबाबदार चालक निर्माण होतील.’कार्तिकेयनने पुढे म्हटले की, ‘आपल्याकडे सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले जात नाही, जे खूप गंभीर आहे. कोणतेही वाहन चालविताना सुरक्षितता महत्त्वाची असते. भविष्यात बाइक, कार आणखी वाढतील. त्यामुळेच पुरेपूर सुरक्षितता बाळगून वाहन चालविणेच योग्य राहील. विशेष करून तरुणांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी.’भारतीय युवा रेसर्सविषयी कार्तिकेयनने म्हटले की, ‘आज एफ वनच्या दिशेने अनेक भारतीय खेळाडू वेगाने आगेकूच करीत आहेत. अर्जुन सैनीसह अनेक खेळाडू चमकत आहेत. या तरुणांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. त्यामुळेच पुढच्या वर्षी नक्कीच युरोपियन स्तराच्या फॉर्म्युला थ्रीमध्ये भारतीय चालकांचा सहभाग पाहण्यास मिळेल. अधिकाधिक रेस करून युवा भारतीयांना अनुभव मिळेल आणि त्यातूनच ते प्रगती करतील.’रेसिंगचे उज्ज्वल भविष्यभारतात नोएडा येथे रेसिंगसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय येत्या काही वर्षांत भारतात आणखी रेसिंग ट्रॅक निर्माण होतील. त्यामुळे भारतीय रेसिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. आज भारत क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही चमकत आहे. त्यामुळेच भारताची क्रीडादेश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.- नरेन कार्तिकेयन

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात