शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहन परवाना देताना सरकारने घ्यावी विशेष काळजी- नरेन कार्तिकेयन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 01:30 IST

देशाचा पहिला एफवन रेसर याने रस्ते अपघातांविषयी व्यक्त केली चिंता

- रोहित नाईक मुंबई : ‘भारत जगामध्ये रस्ते अपघातांमध्ये आघाडीवर आहे. मोटरस्पोर्ट रेसिंगच्या तुलनेत रस्ते अपघात अधिक धोकादायक असल्याने हे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय सरकारने वाहन चालक परवाना देताना विशेष काळजी घेत चालक चाचणी अधिक कठोर करावी,’ असा सल्ला भारताचा पहिला फॉर्म्युला वन (एफवन) रेसर नरेन कार्तिकेयन याने ‘लोकमत’शी बोलताना दिला.गुरुवारी मुंबईत बीकेसी एमएमआरडीए मैदानात आॅटोकार परफॉर्मन्स शोचे उद्घाटन कार्तिकेयनच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्याने ‘लोकमत’सह संवाद साधताना म्हटले की, ‘आज वाहन परवाना मिळविणे खूप सोपे झाले आहे. अनेक तरुण विनाकारण रहदारीच्या रस्त्यांवर वेगाने वाहने पळवितात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारने परवाना देताना कठोर चाचणी प्रक्रिया घ्यायला पाहिजे. वाहने चालविताना मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लघन होते. वाहने वेगवान होत आहेत, रस्ते सुधारत आहेत. आपले राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे होत आहेत, पण ही सुधारणा होत असताना वाहन चालविण्याचे कौशल्य मात्र सुधारत नाही. त्यामुळेच आपल्याला सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवावे लागतील. विविध चाचण्या केल्यानंतरच सरकारने तरुणांना वाहन परवाना दिला पाहिजे. यामुळे अधिक सुरक्षित व जबाबदार चालक निर्माण होतील.’कार्तिकेयनने पुढे म्हटले की, ‘आपल्याकडे सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले जात नाही, जे खूप गंभीर आहे. कोणतेही वाहन चालविताना सुरक्षितता महत्त्वाची असते. भविष्यात बाइक, कार आणखी वाढतील. त्यामुळेच पुरेपूर सुरक्षितता बाळगून वाहन चालविणेच योग्य राहील. विशेष करून तरुणांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी.’भारतीय युवा रेसर्सविषयी कार्तिकेयनने म्हटले की, ‘आज एफ वनच्या दिशेने अनेक भारतीय खेळाडू वेगाने आगेकूच करीत आहेत. अर्जुन सैनीसह अनेक खेळाडू चमकत आहेत. या तरुणांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. त्यामुळेच पुढच्या वर्षी नक्कीच युरोपियन स्तराच्या फॉर्म्युला थ्रीमध्ये भारतीय चालकांचा सहभाग पाहण्यास मिळेल. अधिकाधिक रेस करून युवा भारतीयांना अनुभव मिळेल आणि त्यातूनच ते प्रगती करतील.’रेसिंगचे उज्ज्वल भविष्यभारतात नोएडा येथे रेसिंगसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय येत्या काही वर्षांत भारतात आणखी रेसिंग ट्रॅक निर्माण होतील. त्यामुळे भारतीय रेसिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. आज भारत क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही चमकत आहे. त्यामुळेच भारताची क्रीडादेश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.- नरेन कार्तिकेयन

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात