शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:07 AM

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली

समीर इनामदार 

पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एनडीएने काँग्रेसप्रणीत आघाडीचा पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयासह काँग्रेसने दक्षिणेतील आपले राज्य गमावले आहे. दक्षिणेकडे कूच करण्यासाठी भाजपने यापूर्वी केलेल्या युक्त्यांना यश आले आहे. हा विजय त्यांना दक्षिणेकडील विजयासाठी प्रवेशद्वार ठरणार आहे. ३० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी १६ ही मॅजिक फिगर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या एन. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले होते. केंद्राने या राज्यात नायब राज्यपाल म्हणून माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची नियुक्ती केली. त्यांनी तीन भाजप सदस्यांना लोकनियुक्त सदस्य म्हणून नियुक्त केले. त्यानंतर हे सरकार अस्थिर करून पाडण्यासाठी खेळी सुरू झाल्या. सरकार अल्पमतात आल्यानंतर नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर किरण बेदी यांना हटविण्यात आले. नंतर याठिकाणी निवडणुका झाल्या.

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली. काँग्रेसने द्रमुक, व्हीसीके आणि भाकप यांच्याशी युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसने १५, एआयएनआरसीने ८, अण्णाद्रमुकने चार, द्रमुकने दोन जागा जिंकल्या होत्या. एन. नारायणसामी निवडून आले नसताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आल्याने आमदार नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली नव्हती. मागील निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. राज्याची विधानसभा किती लहान आहे, हे भाजपसाठी महत्त्वाचे नसून, याचा लाभ भविष्यात कितपत होईल, याकडे लक्ष ठेवून त्यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपला कर्नाटकच्या पुढे भाजपला जाता आले नाही. तामिळनाडू आणि केरळमध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून पुदुच्चेरीला निवडण्यात आले. आता भाजपचे पुढील लक्ष्य तामिळनाडू असणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकTamilnaduतामिळनाडूKeralaकेरळ