शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:45 IST

Sonia Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या नोंदींवरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपानेही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच लक्ष्य केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या नोंदींवरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपानेहीकाँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. सोनिया गांधी ह्या भारताच्या नागरिक बनण्यापूर्वीच तीन वर्षे आधी त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं, असा आरोप भाजपाने केला आहे. इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधी यांनी १९८३ साली भारताचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. मात्र १९८० सालीच त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश झाला होता, असा आरोप भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे.

तर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी १९८० सालच्या एका मतदार यादीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात दिल्ली लोकसभा मतदारसंघातील सफदरजंग रोड येथील मतदान केंद्र क्रमांक १४५ च्या मतदार यादीमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आमि मनेका गांधी यांच्या नावांची नोंद आहे. मतदार यादीत नाव नोंदवलं गेलं तेव्हा सोनिया गांधी ह्या इटलीच्या नागरिक होत्या, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित मालवीय पुढे म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर १९८२ साली सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं. मात्र जानेवारी महिन्यात त्यांचं नाव पुन्हा एकदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं. हे सुद्धा नियमांचं उल्लंघन होतं.  कारण त्यावेळी सुद्धा सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व हे एप्रिल १९८३ मध्ये मिळालं होतं. तर मतदार नोंदणीसाठी निश्चित करण्यात आलेली शेवटची तारीख ही १ जानेवारी १९८३ ही होती.

दरम्यान भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपांनुसार भारताचं नागरिकत्व नसतानाही सोनिया गांधी यांचं नाव दोन वेळा मतदार यादीमध्ये नोंदवलं गेलं. निवडणुकीत झालेल्या गडबडीचं हे स्पष्ट उदाहरण आहे. राजीव गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर सुमारे १५ वर्षे सोनिया गांधी यांनी भारताचं नागरिकत्व का स्वीकारलं नव्हतं? असा सवालही भाजपा नेत्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाAnurag Thakurअनुराग ठाकुरElectionनिवडणूक 2024