शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:24 IST

२०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या...

नवी दिल्ली : २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ‘कोएलिशन इअर्स : १९९६ - २०१२’च्या तिस-या खंडात नमूद केले आहे. बाळासाहेबांनी मुखर्जी तेव्हा मुखर्जीना पाठिंबा दिला होता.प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, मी बाळासाहेबांची भेट न घेतल्यास ते त्याला अपमान समजतील, असे मला शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे सोनिया यांची नापसंती माहीत असूनही बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यास गेलो. ज्या व्यक्तीने आपल्या रालोआमध्ये असूनही मला पाठिंबा दिला, त्याचा अपमान होऊ नये, असे मला मनापासून वाटले होते.मी पवारांना विनंती केली की, त्यांनी मला विमानतळावरुन ठाकरे यांच्या घरी घेऊन जावे. पवार त्यासाठी तयारही झाले. ही भेट अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होती. आपल्या खास शैलीत बाळासाहेब म्हणाले होते की, रॉयल बंगाल टायगरला मराठा टायगरने पाठिंबा देणे स्वाभाविक आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मी एक सांप्रदायिक दृष्टिकोनाचा नेता म्हणून ओळखत होतो. पण, त्यांचा पाठिंबाही विसरणे मला शक्य नव्हते.पवार हे यूपीए - २ चे सहयोगी होते. मी बाळासाहेबांची भेट घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता, असे सांगत आपण घेतलेली भेट योग्यच होती, असा दावाही मुखर्जी यांनी या पुस्तकात केला आहे. आपल्या १३ जुलै २०१२ च्या मुंबई दौ-याचा उल्लेख करून मुखर्जी लिहितात की, सोनिया गांधी व पवार या दोघांना मी विचारले होते की, बाळासाहेबांची भेट मी घ्यावी का? सोनिया गांधी या भेटीच्या बाजूने नव्हत्या. शक्यतो ही भेट मी टाळावी, असे त्यांना वाटत होते. बाळासाहेबांविषयीचे सोनिया यांचे मत त्यांच्या राजकीय विचार व धोरणांवर आधारित होते.शिवसेनेने २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना यांना पाठिंबा देण्याचे कारण समजण्यासारखे होते. प्रतिभाताई महाराष्ट्रातीलच होत्या. पण ठाकरे यांनी माझ्या बाबतीत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानने माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते.मी दिल्लीला परतल्यावर गिरिजा व्यास मला भेटल्या आणि म्हणाल्या की, ठाकरे यांच्या भेटीमुळे सोनिया गांधी व अहमद पटेल नाराज आहेत. मी त्यांच्या नाराजीचे कारण समजू शकतो. पण, मला असे वाटते की, मी जे काही केले ते योग्य होते.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी