शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:24 IST

२०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या...

नवी दिल्ली : २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ‘कोएलिशन इअर्स : १९९६ - २०१२’च्या तिस-या खंडात नमूद केले आहे. बाळासाहेबांनी मुखर्जी तेव्हा मुखर्जीना पाठिंबा दिला होता.प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, मी बाळासाहेबांची भेट न घेतल्यास ते त्याला अपमान समजतील, असे मला शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे सोनिया यांची नापसंती माहीत असूनही बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यास गेलो. ज्या व्यक्तीने आपल्या रालोआमध्ये असूनही मला पाठिंबा दिला, त्याचा अपमान होऊ नये, असे मला मनापासून वाटले होते.मी पवारांना विनंती केली की, त्यांनी मला विमानतळावरुन ठाकरे यांच्या घरी घेऊन जावे. पवार त्यासाठी तयारही झाले. ही भेट अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होती. आपल्या खास शैलीत बाळासाहेब म्हणाले होते की, रॉयल बंगाल टायगरला मराठा टायगरने पाठिंबा देणे स्वाभाविक आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मी एक सांप्रदायिक दृष्टिकोनाचा नेता म्हणून ओळखत होतो. पण, त्यांचा पाठिंबाही विसरणे मला शक्य नव्हते.पवार हे यूपीए - २ चे सहयोगी होते. मी बाळासाहेबांची भेट घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता, असे सांगत आपण घेतलेली भेट योग्यच होती, असा दावाही मुखर्जी यांनी या पुस्तकात केला आहे. आपल्या १३ जुलै २०१२ च्या मुंबई दौ-याचा उल्लेख करून मुखर्जी लिहितात की, सोनिया गांधी व पवार या दोघांना मी विचारले होते की, बाळासाहेबांची भेट मी घ्यावी का? सोनिया गांधी या भेटीच्या बाजूने नव्हत्या. शक्यतो ही भेट मी टाळावी, असे त्यांना वाटत होते. बाळासाहेबांविषयीचे सोनिया यांचे मत त्यांच्या राजकीय विचार व धोरणांवर आधारित होते.शिवसेनेने २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना यांना पाठिंबा देण्याचे कारण समजण्यासारखे होते. प्रतिभाताई महाराष्ट्रातीलच होत्या. पण ठाकरे यांनी माझ्या बाबतीत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानने माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते.मी दिल्लीला परतल्यावर गिरिजा व्यास मला भेटल्या आणि म्हणाल्या की, ठाकरे यांच्या भेटीमुळे सोनिया गांधी व अहमद पटेल नाराज आहेत. मी त्यांच्या नाराजीचे कारण समजू शकतो. पण, मला असे वाटते की, मी जे काही केले ते योग्य होते.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी