शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Congress Chintan Shibir : "इथं मनमोकळेपणानं बोला, पण..."; चिंतन शिबिरात सोनिया गांधी कार्यकर्त्यांना स्पष्टच बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:23 IST

मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. 

आपण येथे मनमोकळेपणाने आपले मत मांडण्यासाठी स्वतंत्र आहात. पण, संघटन एक आहे, हाच संदेश बाहेर जायला हवा. काँग्रेस पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. पण, आता पक्षाचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस अधक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्या आज राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

सोनिया म्हणाल्या, आपण जेव्हा येथून बाहेर पडाल, तेव्हा नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन बाहेर पडा. देसातील जनतेला काँग्रेसकडून मोठ्या आशा आहेत. आपल्याला त्यांच्या आशा पूर्ण करून दाखवाव्या लागतील. मोदी सरकारच्या राज्यात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि नोटाबंदीपासून ही घसरण सातत्याने सुरूच आहे. एवढेच नाही, तर आता आपल्याला नोकऱ्या मिळणार नाहीत, हे लोकांनी गृहित धरले आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाई