शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सोनिया गांधींना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती - शरद पवार

By admin | Updated: December 11, 2015 17:09 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती असा दावा शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ -  पंतप्रधानपदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती नको होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या 'लाईफ  ऑन माय टर्मस' या आत्मचरित्रात केला आहे. कालच गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. स्वत: सोनिया गांधी या पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थित होत्या. 

१९९१ मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये असताना त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. मात्र त्यावेळी सोनिया गांधींच्या निकटवर्तीय असणा-या नेत्यांनी पवारांपेक्षा नरसिंहराव कसे योग्य आहेत ते पटवून दिले. दिवंगत काँग्रेस नेते अर्जून सिंह त्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांनीही पवारांपेक्षा राव कसे योग्य आहेत ते १० जनपथला पटवून दिले असा दावा शरद पवारांनी या पुस्तकातील एका अध्यायात केला आहे. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार संरक्षणमंत्री होते. 
 
पंतप्रधानपदासाठी त्यावेळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, अन्य राज्यातही माझ्या नवाची चर्चा होती. पण मी सावध होतो. १० जनपथ म्हणजेच सोनिया गांधींच्या मतावर बरेच काही अवलंबून आहे याची मला कल्पना होती. त्यावेळी निवडणुकीपूर्वी पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. पण त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि राजीव गांधी यांच्या अकाली निधनामुळे त्यांना परत बोलवावे असे काहींनी सल्ला दिला होता असे पवारांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. 
शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान झाले तर, गांधी कुटुंबाच्या हिताला बाधा पोहोचेल असे त्यावेळी सोनिया गांधींशी निष्ठावंत असणा-या नेत्यांचे मत होते. नरसिंह रावांच्या तुलनेत मी तरुण असल्यामुळे दीर्घकाळ पंतप्रधानपदी रहाण्याची भिती काँग्रेस नेत्यांना सतावत होती. 
त्यामुळे एम.एल फोतेदार, आर.के.धवन, अर्जुन सिंह, अर्जुन सिंह आणि व्ही. जॉर्ज या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना नरसिंह राव यांना पाठिंबा देणे योग्य राहील हे पटवून दिले. अर्जुन सिंह स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. राव यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनू असे त्यांना वाटत होते असे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.