शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सोनिया गांधींना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती - शरद पवार

By admin | Updated: December 11, 2015 17:09 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती असा दावा शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ -  पंतप्रधानपदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती नको होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या 'लाईफ  ऑन माय टर्मस' या आत्मचरित्रात केला आहे. कालच गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. स्वत: सोनिया गांधी या पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थित होत्या. 

१९९१ मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये असताना त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. मात्र त्यावेळी सोनिया गांधींच्या निकटवर्तीय असणा-या नेत्यांनी पवारांपेक्षा नरसिंहराव कसे योग्य आहेत ते पटवून दिले. दिवंगत काँग्रेस नेते अर्जून सिंह त्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांनीही पवारांपेक्षा राव कसे योग्य आहेत ते १० जनपथला पटवून दिले असा दावा शरद पवारांनी या पुस्तकातील एका अध्यायात केला आहे. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार संरक्षणमंत्री होते. 
 
पंतप्रधानपदासाठी त्यावेळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, अन्य राज्यातही माझ्या नवाची चर्चा होती. पण मी सावध होतो. १० जनपथ म्हणजेच सोनिया गांधींच्या मतावर बरेच काही अवलंबून आहे याची मला कल्पना होती. त्यावेळी निवडणुकीपूर्वी पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. पण त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि राजीव गांधी यांच्या अकाली निधनामुळे त्यांना परत बोलवावे असे काहींनी सल्ला दिला होता असे पवारांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. 
शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान झाले तर, गांधी कुटुंबाच्या हिताला बाधा पोहोचेल असे त्यावेळी सोनिया गांधींशी निष्ठावंत असणा-या नेत्यांचे मत होते. नरसिंह रावांच्या तुलनेत मी तरुण असल्यामुळे दीर्घकाळ पंतप्रधानपदी रहाण्याची भिती काँग्रेस नेत्यांना सतावत होती. 
त्यामुळे एम.एल फोतेदार, आर.के.धवन, अर्जुन सिंह, अर्जुन सिंह आणि व्ही. जॉर्ज या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना नरसिंह राव यांना पाठिंबा देणे योग्य राहील हे पटवून दिले. अर्जुन सिंह स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. राव यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनू असे त्यांना वाटत होते असे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.