शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

"माझा मुलगा बुडतोय, त्याला बाहेर काढा"; गुजरात पूल दुर्घटनेत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 21:17 IST

गुजरातमध्ये पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gujarat Bridge Collapse: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी पुलाचा एक भाग कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली. गुजरात पूल दुर्घटनेत अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. त्यांच्यावर काय संकट ओढावलं असेल हे फक्त तेच समजू शकतात, आपण फक्त कल्पना करू शकतो. गुजरातमध्ये पुलाचा भाग कोसळून एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ही महिला आक्रोश होती.

गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा पुलावरुन वाहने जात होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. दोन जण बेपत्ता आहेत. ४५ वर्षे जुना हा पूल दक्षिण गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. या भीषण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये कंबरेभर पाण्यात उभी राहून गाडीत अडकलेल्या तिच्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडून मदत मागत होती.

"माझा मुलगा बुडेल, कोणीतरी कृपया त्याला वाचवा," असं ती आई ओरडत होती. पाण्यात उभी राहून तिच्या मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. तिचा मुलगा गाडीत अडकला होता. त्या आईच्या ओरडण्या ऐकून लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.

बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास, वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल अचानक कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर प्रचंड वाहतूक होती आणि दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक इको कार आणि एक ऑटो रिक्षा ही वाहने महिसागर नदीत पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पूल कोसळताच मोठा आवाज आला आणि काही क्षणातच मोठ्याने आरडाओरडा सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली," असं मदतकार्य करणाऱ्या एका तरुणाने सांगितले. या अपघातासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोकांचा आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात