शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

"माझा मुलगा बुडतोय, त्याला बाहेर काढा"; गुजरात पूल दुर्घटनेत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 21:17 IST

गुजरातमध्ये पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gujarat Bridge Collapse: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी पुलाचा एक भाग कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली. गुजरात पूल दुर्घटनेत अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. त्यांच्यावर काय संकट ओढावलं असेल हे फक्त तेच समजू शकतात, आपण फक्त कल्पना करू शकतो. गुजरातमध्ये पुलाचा भाग कोसळून एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ही महिला आक्रोश होती.

गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा पुलावरुन वाहने जात होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. दोन जण बेपत्ता आहेत. ४५ वर्षे जुना हा पूल दक्षिण गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. या भीषण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये कंबरेभर पाण्यात उभी राहून गाडीत अडकलेल्या तिच्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडून मदत मागत होती.

"माझा मुलगा बुडेल, कोणीतरी कृपया त्याला वाचवा," असं ती आई ओरडत होती. पाण्यात उभी राहून तिच्या मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. तिचा मुलगा गाडीत अडकला होता. त्या आईच्या ओरडण्या ऐकून लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.

बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास, वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल अचानक कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर प्रचंड वाहतूक होती आणि दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक इको कार आणि एक ऑटो रिक्षा ही वाहने महिसागर नदीत पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पूल कोसळताच मोठा आवाज आला आणि काही क्षणातच मोठ्याने आरडाओरडा सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली," असं मदतकार्य करणाऱ्या एका तरुणाने सांगितले. या अपघातासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोकांचा आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात