शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'NDAच्या काही नेत्यांना मोदी पंतप्रधानपदी नकोत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:22 IST

गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, टीडीपी, अकाली दल या पक्षांनी जाहीररीत्या टीका केली आहे. तसेच चंद्राबाबूंचा टीडीपीही मोदी सरकारमधून बाहेर पडला. आता बिहारमधल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  एनडीएच्या काही लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी नको आहेत.यासंदर्भात विस्तारानं सांगितल्यास घरातली गोष्ट बाहेर जाण्यासारखं होईल. वेळ आल्यावर अशा लोकांचा मी खुलासा करेन, असंही कुशवाह म्हणाले आहेत. जागावाटपाबाबत ते म्हणाले, जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. भाजपा आणि रामविलास पासवान यांनीही यावर खुलासा केला आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात होणा-या चर्चा या चुकीच्या आहेत.एनडीएमधीलच काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरतायत. त्यांना वाटतं की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी ते काहीना काही उचापत्या करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या बैठक झाल्यानंतर मी चर्चा करणार आहे. आरक्षणानं कोणाचंही नुकसान होत नाही. दक्षिणेकडच्या राज्यांत सर्वाधिक आरक्षण आहे. ती राज्ये सर्वाधिक विकसित आहेत. आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये चुकीचा समज पसरवला जातोय. बिहारच्या लोकांमधील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असंही कुशवाह म्हणाले आहेत. तत्पूर्वी एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी(आरएलएसपी)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. कुशवाह यांनी भर सभेत तशा प्रकारचे संकेत दिले होते. पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुशवाह म्हणाले होते की, स्वादिष्ट खीर ही यादवांचं दूध आणि कुशवाह लोकांनी पिकवलेल्या भातानंच होऊ शकते.यादवांकडे प्रामुख्यानं दूध उत्पादक म्हणून पाहिलं जातं. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा पक्ष आरजेडींकडे यादवांचं प्राबल्य आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वतः कुशवाह समाजातून आलेले आहेत. कुशवाह समाजाचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन हे भात पिकवणं आहे. त्यामुळे कुशवाह यांनी केलेल्या खिरीचा संदर्भ लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीकडे असल्याचाही काहींचा कयास आहे. येत्या काही दिवसांत कुशवाह महागठबंधनचाही भाग होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा