शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

'NDAच्या काही नेत्यांना मोदी पंतप्रधानपदी नकोत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:22 IST

गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, टीडीपी, अकाली दल या पक्षांनी जाहीररीत्या टीका केली आहे. तसेच चंद्राबाबूंचा टीडीपीही मोदी सरकारमधून बाहेर पडला. आता बिहारमधल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  एनडीएच्या काही लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी नको आहेत.यासंदर्भात विस्तारानं सांगितल्यास घरातली गोष्ट बाहेर जाण्यासारखं होईल. वेळ आल्यावर अशा लोकांचा मी खुलासा करेन, असंही कुशवाह म्हणाले आहेत. जागावाटपाबाबत ते म्हणाले, जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. भाजपा आणि रामविलास पासवान यांनीही यावर खुलासा केला आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात होणा-या चर्चा या चुकीच्या आहेत.एनडीएमधीलच काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरतायत. त्यांना वाटतं की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी ते काहीना काही उचापत्या करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या बैठक झाल्यानंतर मी चर्चा करणार आहे. आरक्षणानं कोणाचंही नुकसान होत नाही. दक्षिणेकडच्या राज्यांत सर्वाधिक आरक्षण आहे. ती राज्ये सर्वाधिक विकसित आहेत. आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये चुकीचा समज पसरवला जातोय. बिहारच्या लोकांमधील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असंही कुशवाह म्हणाले आहेत. तत्पूर्वी एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी(आरएलएसपी)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. कुशवाह यांनी भर सभेत तशा प्रकारचे संकेत दिले होते. पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुशवाह म्हणाले होते की, स्वादिष्ट खीर ही यादवांचं दूध आणि कुशवाह लोकांनी पिकवलेल्या भातानंच होऊ शकते.यादवांकडे प्रामुख्यानं दूध उत्पादक म्हणून पाहिलं जातं. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा पक्ष आरजेडींकडे यादवांचं प्राबल्य आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वतः कुशवाह समाजातून आलेले आहेत. कुशवाह समाजाचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन हे भात पिकवणं आहे. त्यामुळे कुशवाह यांनी केलेल्या खिरीचा संदर्भ लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीकडे असल्याचाही काहींचा कयास आहे. येत्या काही दिवसांत कुशवाह महागठबंधनचाही भाग होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा