शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:26 IST

नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली : ईशान्य लद्दाखमध्ये भारत-चीनदरम्यान लष्करी स्तरावरील चर्चेस मंगळवारपासून सुरूवात झाली. दोन्ही देशांमध्ये ही चर्चेची सहावी फेरी आहे. महिनाभरापासून दर आठवड्यास लष्करी व राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होत आहे.मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली चर्चा सायंकाळी उशीरापर्यंत चालली. पँगाँग सरोवर व फिंगर पॉर्इंट ४ पासून दोन्ही बाजूच्या सैनिकांना मागे हटवण्यावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही बाजूचे सैनिक गलवान खोऱ्यातील ३ चौक्यांमधून २ किमी मागे हटण्याची शक्यता आहे. चुशुल सीमेवरील चौकीत चर्चा सुरू आहे. लेफ्टनन जनरल हरिंदर सिंह यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले. गेल्या दशकभरापासून ते याच भागात तैनात आहे. दक्षिण क्षिनजियांग लष्करी तळाचे प्रमुख मेजर जनरल लुई लिन यांनी चीनकडून चर्चेत सहभाग घेतला. बरोबर महिनाभरापूर्वी दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये ऐतिहासिक झटापट झाली. हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले.तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भर- नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.- गलवान, गोग्रा व हॉटस्प्रिंगमध्ये भारताने सैनिकांची गस्त वाढवली. केवळ सैनिकच नव्हे तर या भागात तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भारताचा भर आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव