शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भारीच! गावात शेतीशिवाय कमाईची सुवर्णसंधी, 'या' योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार तब्बल 3.75 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:33 IST

Soil Health Card Scheme : आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया... 

नवी दिल्ली - तुम्हाला शेती क्षेत्रात आवड असून आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र शेती करायची नाही तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ व्यवसायच सुरू करू शकत नाही तर त्यातून चांगले पैसे देखील कमवू शकता. रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येणार आहे. तसेच ज्यांना काही तरी वेगळं करायचं आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया... 

काय आहे योजना?

केंद्र सरकारच्या या योजनेला सॉइल हेल्थ कार्ड स्कीम (Soil Health Card Scheme) असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर मिनी सॉइल टेस्टिंग लॅबची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर या लॅबच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. देशातील शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत सध्या प्रयोगशाळा फारच कमी आहेत. त्यामुळे त्यात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच देशाला अशा प्रयोगशाळांची खूप आवश्यकता आहे.

नेमकं काम काय?

शेतातील मातीची यामध्ये चाचणी केली जाते. मातीची तपासणी करुन त्यात आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात आणि तपासणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पानद वाढवण्यात खूप मदत होते. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. लागवडीच्या वेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवं हे माती तपासल्यानंतर समजतं. याचबरोबरच खतांविषयी बरीच माहिती मिळते.

कोण सुरू करू शकतं ही लॅब?

या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. यासह उमेदवाराला एग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण, द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात मॅट्रिक असणं आवश्यक आहे.

किती होतो खर्च?

साधारणपणे अशी कोणतीही लॅब स्थापित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा (Soil Health Card Scheme) फायदा घेतल्यास, त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. याचाच अर्थ सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला केवळ 1 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यातून तुम्ही चांगली कमाईदेखील करू शकता.

कुठे संपर्क करायचा?

लॅब सुरू करण्याची इच्छा असलेले तरुण, उमेदवार, शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू शकतात. यासाठी तुम्ही agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या वेबसाईटचा वापर करू शकता. किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते. सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. तसेच संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीIndiaभारतbusinessव्यवसायMONEYपैसा