शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी भाजपाने निवडली ही वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 11:44 IST

धक्कातंत्राचा वापर करत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता भाजपाने अचानक घेतलेल्या या निर्णयासाठी निवडलेल्या वेळेची चर्चा होत आहे.

नवी दिल्ली - धक्कातंत्राचा वापर करत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता भाजपाने अचानक घेतलेल्या या निर्णयासाठी निवडलेल्या वेळेची चर्चा होत आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या आधी होणार नाही हे निश्चित करून भाजपाने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढल्याचे बोलले जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राज्यपाल शासन लागू करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने राज्यपाल शासनामध्येच निघून जावेत अशी भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा आहे. कारण हे सहा महिने राज्यपाल राजवटीत निघून गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजेल. अशा परिस्थितीत लोकसभेबरोबरच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणुकही होईल, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे. सद्यस्थितीत पुढील वर्षाच्या पूर्वार्धाच लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.  काल भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल वोहरा यांनी मुफ्ती, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPoliceपोलिस