शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

...म्हणून काँग्रेसचे मित्रपक्षही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून राहताहेत चार हात दूर, समोर येतंय धक्कादायक कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:05 IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना ज्याप्रकारे दक्षिण भारतात विरोधी आणि मित्र पक्षांची साथ मिळाली त्याप्रमाणे उत्तर भारतात मात्र त्यांना साथ मिळताना दिसलेली नाही. उत्तर भारतामध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधींच्या या यात्रेपासून चार हात दूर राहताना दिसत  आहेत.

छोट्याशा विश्रांतीनंतर राहुल गांधी त्यांच्या महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेवर पुन्हा एकदा निघाले आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरकडे निघालेले राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. मात्र राहुल गांधींना ज्याप्रकारे दक्षिण भारतात विरोधी आणि मित्र पक्षांची साथ मिळाली त्याप्रमाणे उत्तर भारतात मात्र त्यांना साथ मिळताना दिसलेली नाही. उत्तर भारतामध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधींच्या या यात्रेपासून चार हात दूर राहताना दिसत  आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांमधील अखिलेश यादव आणि मायावतींसह सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवले होते. तसेच बिहारमधील जेडीयू आणि आरजेडीसह सर्व पक्षांना निमंत्रितकेले होते. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कुठल्याही मोठ्या पक्षाचा बडा नेता भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत नाही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर भारत जोडो यात्रा ही काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीनेही या यात्रेत सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे हिंदी पट्ट्यामधील राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे मित्रपक्ष राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेपासून चार हात दूर का राहत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सशक्त नेता म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भाजपासह सर्व विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. हे पक्ष काँग्रेसच्या कोअर मतदाराला आपल्याकडो ओढून तिथे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते त्या त्या राज्यांमध्ये काँग्रेसला पुन्हा पाय रोवू देऊ इच्छित नाहीत.

उत्तर प्रदेशामध्ये सपा, बसपा, आरएलडी एकेकाळच्या व्होटबँकेच्या मदतीने राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत. तर बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि डाव्या पक्षांनाही याच व्होटबँकेचा आधार आहे. मात्रा आता भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे ही व्होटबँक पुन्हा काँग्रेसकडे सरकेल. अशी या पक्षांना भीती आहे.

काँग्रेस हाच एकमात्र असा पक्ष आहे जो संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी पसरलेला आहे. केंद्रात स्पष्ट बहुमतासह दोन वेळा सरकार स्थापन केल्यानंतरही भाजपाला अजून देशातील काही भागात आपला प्रभाव निर्माण करता आलेला नाही. एवढ्या कमकुवत स्थितीतही  काँग्रेसला जगभरातून मते मिळतात. तसेच देशातील कानाकोपऱ्यातून त्यांचे आमदार निवडून येतात.

दरम्यान, २०२४ मध्ये मोदींसमोर विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उबे राहण्यासाठी नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, केसीआर, ममता बॅनर्जी आदी नेते प्रयत्नशील आहेत. ममता बॅनर्जी आणि केसीआर कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला विरोधी गटाचं नेतृत्व करू देणार नाहीत. तर अखिलेश आणि मायावती यांनीही आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व पक्ष भारत जोडो यात्रेपासून दूर आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस