शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 21:12 IST

Election Commission OF India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने शंका उपस्थित करत असलेल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना यांना प्रतिप्रश्न केला आहे.  मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा केली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं काम ९० टक्के पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील विधानसभेची निवडणूक ही नव्या मतदार यादीनुसारच होणार हे निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि सरकारच्या हेतूंवर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधीही निवडणूक आयोगवर टीका करत आहेत. तसेच महाराष्ट्र आमि कर्नाटकमधील उदाहरणं देत त्यांनी निवडणूक चोरण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व आरोपांना उत्तरं दिली आहेत.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, जर तुम्हाला काही चुकीचं होतं आहे असं वाटंत असेल तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जर याचिका दाखल करण्यात आली असेल तर निकालही येईल. तोपर्यंत त्याची वाट पाहिली पाहिजे. तसेच कुठली याचिका दाखल झाली नसेल तर अशा प्रकारे आरोप करण्याला अर्थ नाही. अशा प्रकारे निवडणूक आयोगाने या प्रकरणी निर्णय कोर्टावर सोडला आहे.

तेजस्वी यादव निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ५२ ते ५५ लाख मतदार आपल्या पत्त्यावर नसल्याचे म्हटले आहे. काहींना मृत घोषित करण्यात आलेलं आहे. तर काहींनी मतदारसंघ बदलला आहे. त्यामुळे आम्ही या संपूर्ण प्रकियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. दरम्यान, आता मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल