शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 21:12 IST

Election Commission OF India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने शंका उपस्थित करत असलेल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना यांना प्रतिप्रश्न केला आहे.  मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा केली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं काम ९० टक्के पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील विधानसभेची निवडणूक ही नव्या मतदार यादीनुसारच होणार हे निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि सरकारच्या हेतूंवर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधीही निवडणूक आयोगवर टीका करत आहेत. तसेच महाराष्ट्र आमि कर्नाटकमधील उदाहरणं देत त्यांनी निवडणूक चोरण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व आरोपांना उत्तरं दिली आहेत.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, जर तुम्हाला काही चुकीचं होतं आहे असं वाटंत असेल तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जर याचिका दाखल करण्यात आली असेल तर निकालही येईल. तोपर्यंत त्याची वाट पाहिली पाहिजे. तसेच कुठली याचिका दाखल झाली नसेल तर अशा प्रकारे आरोप करण्याला अर्थ नाही. अशा प्रकारे निवडणूक आयोगाने या प्रकरणी निर्णय कोर्टावर सोडला आहे.

तेजस्वी यादव निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ५२ ते ५५ लाख मतदार आपल्या पत्त्यावर नसल्याचे म्हटले आहे. काहींना मृत घोषित करण्यात आलेलं आहे. तर काहींनी मतदारसंघ बदलला आहे. त्यामुळे आम्ही या संपूर्ण प्रकियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. दरम्यान, आता मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? अशी विचारणा निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल