शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 21:23 IST

Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.

मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधीलप्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमधून शशी थरूर यांनी दिल्ली अजूनही देशाची राजधानी म्हणून राहण्यास लायक आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यावर अनेक युझर्सनी देशाची राजधानी ही दिल्लीहून चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या कुठल्या तरी शहरामध्ये स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिला.

दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, याआधी अनेक देशांनी आपल्या राजधान्या बदलल्या आहेत. इंडोनेशियाने २०२२ मध्ये पर्यावरणीय आव्हानं आणि वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी जकार्ता येथून नुसंतार येथे स्थलांतरीत करण्याचा कायदा पारित केला होता. इंडोनेशियासुद्धा जकार्तामधील प्रदूषणाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जकार्तापासून सुमारे १ हजार किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी देशाची नवी राजधानी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच २०४५ पर्यंत इंडोनेशियाची राजधानी ही जकार्ताहून नुसंतारा येथे पूर्णपणे स्थलांतरीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.९०५ लाख कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जकार्ता येथून नुसंतारा येथे १.९ दक्षलक्ष लोकांचं स्थलांतर करण्यात येण्याची अपेक्षा आहे. दिल्लीप्रमाणेच जकार्तासुद्धा दरवर्षी खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे त्रस्त आहे. जकार्तामध्ये सध्या एक कोटी नागरिकांचं वास्तव्य आहे. येथे मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान येथील हवेची गुणवत्ता खूपच खराब असते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरdelhiदिल्लीpollutionप्रदूषणIndiaभारत