शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 21:23 IST

Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.

मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधीलप्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमधून शशी थरूर यांनी दिल्ली अजूनही देशाची राजधानी म्हणून राहण्यास लायक आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यावर अनेक युझर्सनी देशाची राजधानी ही दिल्लीहून चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या कुठल्या तरी शहरामध्ये स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिला.

दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, याआधी अनेक देशांनी आपल्या राजधान्या बदलल्या आहेत. इंडोनेशियाने २०२२ मध्ये पर्यावरणीय आव्हानं आणि वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी जकार्ता येथून नुसंतार येथे स्थलांतरीत करण्याचा कायदा पारित केला होता. इंडोनेशियासुद्धा जकार्तामधील प्रदूषणाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जकार्तापासून सुमारे १ हजार किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी देशाची नवी राजधानी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच २०४५ पर्यंत इंडोनेशियाची राजधानी ही जकार्ताहून नुसंतारा येथे पूर्णपणे स्थलांतरीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.९०५ लाख कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जकार्ता येथून नुसंतारा येथे १.९ दक्षलक्ष लोकांचं स्थलांतर करण्यात येण्याची अपेक्षा आहे. दिल्लीप्रमाणेच जकार्तासुद्धा दरवर्षी खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे त्रस्त आहे. जकार्तामध्ये सध्या एक कोटी नागरिकांचं वास्तव्य आहे. येथे मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान येथील हवेची गुणवत्ता खूपच खराब असते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरdelhiदिल्लीpollutionप्रदूषणIndiaभारत