शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 21:23 IST

Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.

मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधीलप्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमधून शशी थरूर यांनी दिल्ली अजूनही देशाची राजधानी म्हणून राहण्यास लायक आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यावर अनेक युझर्सनी देशाची राजधानी ही दिल्लीहून चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या कुठल्या तरी शहरामध्ये स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिला.

दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, याआधी अनेक देशांनी आपल्या राजधान्या बदलल्या आहेत. इंडोनेशियाने २०२२ मध्ये पर्यावरणीय आव्हानं आणि वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी जकार्ता येथून नुसंतार येथे स्थलांतरीत करण्याचा कायदा पारित केला होता. इंडोनेशियासुद्धा जकार्तामधील प्रदूषणाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जकार्तापासून सुमारे १ हजार किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी देशाची नवी राजधानी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच २०४५ पर्यंत इंडोनेशियाची राजधानी ही जकार्ताहून नुसंतारा येथे पूर्णपणे स्थलांतरीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.९०५ लाख कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जकार्ता येथून नुसंतारा येथे १.९ दक्षलक्ष लोकांचं स्थलांतर करण्यात येण्याची अपेक्षा आहे. दिल्लीप्रमाणेच जकार्तासुद्धा दरवर्षी खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे त्रस्त आहे. जकार्तामध्ये सध्या एक कोटी नागरिकांचं वास्तव्य आहे. येथे मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान येथील हवेची गुणवत्ता खूपच खराब असते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरdelhiदिल्लीpollutionप्रदूषणIndiaभारत