शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 21:23 IST

Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.

मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधीलप्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमधून शशी थरूर यांनी दिल्ली अजूनही देशाची राजधानी म्हणून राहण्यास लायक आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यावर अनेक युझर्सनी देशाची राजधानी ही दिल्लीहून चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या कुठल्या तरी शहरामध्ये स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिला.

दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, याआधी अनेक देशांनी आपल्या राजधान्या बदलल्या आहेत. इंडोनेशियाने २०२२ मध्ये पर्यावरणीय आव्हानं आणि वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी जकार्ता येथून नुसंतार येथे स्थलांतरीत करण्याचा कायदा पारित केला होता. इंडोनेशियासुद्धा जकार्तामधील प्रदूषणाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जकार्तापासून सुमारे १ हजार किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी देशाची नवी राजधानी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच २०४५ पर्यंत इंडोनेशियाची राजधानी ही जकार्ताहून नुसंतारा येथे पूर्णपणे स्थलांतरीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.९०५ लाख कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जकार्ता येथून नुसंतारा येथे १.९ दक्षलक्ष लोकांचं स्थलांतर करण्यात येण्याची अपेक्षा आहे. दिल्लीप्रमाणेच जकार्तासुद्धा दरवर्षी खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे त्रस्त आहे. जकार्तामध्ये सध्या एक कोटी नागरिकांचं वास्तव्य आहे. येथे मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान येथील हवेची गुणवत्ता खूपच खराब असते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरdelhiदिल्लीpollutionप्रदूषणIndiaभारत