शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 18:26 IST

P. V. Narasimha Rao: माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, हो नरसिंह हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, असं मी म्हटलं होतं. आम्ही निर्णय घेतला होता की, निवडणूक हरल्यानंतर विरोधी पक्षांचं एक अधिवेशन होईल आणि त्यासाठी थीम तयार करायची होती. तेव्हा नरसिंह राव मला म्हणाले की, या प्रश्नांची उत्तरं द्या. हज मंजिल मुंबईमध्ये का आहे? हिंदूंसाठी काही का नाही? असा त्यांच्या प्रश्नांचा रोख होता.

मणिशंकर अय्यर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आम्ही आम्ही उत्तरं लिहून आणली तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, मला ती पाहायची नाही आहेत. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा विचार आहे. त्यानंतर काय होणार होतं. ते संमेलन कुठल्याही थीमविनाच झालं. राजीव गांधी यांच्या सदभावना यात्रेवेळी तब्येत बरी नसल्याचे सांगत नरसिंह राव यांनी भाग घेतला नाही. मला राम-रहीम यात्रेच्यामधूनचन बोलावून घेतलं. मी दिल्लीला आलो तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, माझा यात्रेला काहीच आक्षेप नाही आहे, पण तुमच्या सेक्युलॅरिझमची थोडी अडचण आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हटलं ही तर भाजपाची विचारसरणी आहे.

अय्यर पुढे म्हणाले की, या घटनेनंतर माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली. जेव्हा बाबरी पाडण्यात आली तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते. एका बैठकीत राव म्हणाले होते की, जुन्या काळात राजा साधू-संतांकडून सल्ला घ्यायचे. मात्र यावेळी साधू-संतांनी माझ्याकडून सल्ला ऐकला नाही. मी मनात विचार करत होतो की, हे कशा प्रकारचे पंतप्रधान आहेत.

अय्यर यांनी यावेळी राजीव गांधींवरही टीका केली. ते म्हणाले की, अयोध्येमध्ये भूमीपूजन करणं ही राजीव गांधी यांची मोठी चूक होती. तसेच मी अन्य कुणाला दोषी ठरवत नाही आहे. अयोध्येत भूमिपूजन करणं हे पाप होतं. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मात्र शेवटी तो पंतप्रधानांचा निर्णय असतो. त्या भूमिपूजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाला एवढं बळ मिळालं की, त्यानंतर आम्ही भाजपाला रोखू शकलो नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा