शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 18:26 IST

P. V. Narasimha Rao: माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, हो नरसिंह हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, असं मी म्हटलं होतं. आम्ही निर्णय घेतला होता की, निवडणूक हरल्यानंतर विरोधी पक्षांचं एक अधिवेशन होईल आणि त्यासाठी थीम तयार करायची होती. तेव्हा नरसिंह राव मला म्हणाले की, या प्रश्नांची उत्तरं द्या. हज मंजिल मुंबईमध्ये का आहे? हिंदूंसाठी काही का नाही? असा त्यांच्या प्रश्नांचा रोख होता.

मणिशंकर अय्यर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आम्ही आम्ही उत्तरं लिहून आणली तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, मला ती पाहायची नाही आहेत. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा विचार आहे. त्यानंतर काय होणार होतं. ते संमेलन कुठल्याही थीमविनाच झालं. राजीव गांधी यांच्या सदभावना यात्रेवेळी तब्येत बरी नसल्याचे सांगत नरसिंह राव यांनी भाग घेतला नाही. मला राम-रहीम यात्रेच्यामधूनचन बोलावून घेतलं. मी दिल्लीला आलो तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, माझा यात्रेला काहीच आक्षेप नाही आहे, पण तुमच्या सेक्युलॅरिझमची थोडी अडचण आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हटलं ही तर भाजपाची विचारसरणी आहे.

अय्यर पुढे म्हणाले की, या घटनेनंतर माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली. जेव्हा बाबरी पाडण्यात आली तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते. एका बैठकीत राव म्हणाले होते की, जुन्या काळात राजा साधू-संतांकडून सल्ला घ्यायचे. मात्र यावेळी साधू-संतांनी माझ्याकडून सल्ला ऐकला नाही. मी मनात विचार करत होतो की, हे कशा प्रकारचे पंतप्रधान आहेत.

अय्यर यांनी यावेळी राजीव गांधींवरही टीका केली. ते म्हणाले की, अयोध्येमध्ये भूमीपूजन करणं ही राजीव गांधी यांची मोठी चूक होती. तसेच मी अन्य कुणाला दोषी ठरवत नाही आहे. अयोध्येत भूमिपूजन करणं हे पाप होतं. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मात्र शेवटी तो पंतप्रधानांचा निर्णय असतो. त्या भूमिपूजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाला एवढं बळ मिळालं की, त्यानंतर आम्ही भाजपाला रोखू शकलो नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा