शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 18:26 IST

P. V. Narasimha Rao: माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, हो नरसिंह हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, असं मी म्हटलं होतं. आम्ही निर्णय घेतला होता की, निवडणूक हरल्यानंतर विरोधी पक्षांचं एक अधिवेशन होईल आणि त्यासाठी थीम तयार करायची होती. तेव्हा नरसिंह राव मला म्हणाले की, या प्रश्नांची उत्तरं द्या. हज मंजिल मुंबईमध्ये का आहे? हिंदूंसाठी काही का नाही? असा त्यांच्या प्रश्नांचा रोख होता.

मणिशंकर अय्यर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आम्ही आम्ही उत्तरं लिहून आणली तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, मला ती पाहायची नाही आहेत. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा विचार आहे. त्यानंतर काय होणार होतं. ते संमेलन कुठल्याही थीमविनाच झालं. राजीव गांधी यांच्या सदभावना यात्रेवेळी तब्येत बरी नसल्याचे सांगत नरसिंह राव यांनी भाग घेतला नाही. मला राम-रहीम यात्रेच्यामधूनचन बोलावून घेतलं. मी दिल्लीला आलो तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, माझा यात्रेला काहीच आक्षेप नाही आहे, पण तुमच्या सेक्युलॅरिझमची थोडी अडचण आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हटलं ही तर भाजपाची विचारसरणी आहे.

अय्यर पुढे म्हणाले की, या घटनेनंतर माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली. जेव्हा बाबरी पाडण्यात आली तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते. एका बैठकीत राव म्हणाले होते की, जुन्या काळात राजा साधू-संतांकडून सल्ला घ्यायचे. मात्र यावेळी साधू-संतांनी माझ्याकडून सल्ला ऐकला नाही. मी मनात विचार करत होतो की, हे कशा प्रकारचे पंतप्रधान आहेत.

अय्यर यांनी यावेळी राजीव गांधींवरही टीका केली. ते म्हणाले की, अयोध्येमध्ये भूमीपूजन करणं ही राजीव गांधी यांची मोठी चूक होती. तसेच मी अन्य कुणाला दोषी ठरवत नाही आहे. अयोध्येत भूमिपूजन करणं हे पाप होतं. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मात्र शेवटी तो पंतप्रधानांचा निर्णय असतो. त्या भूमिपूजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाला एवढं बळ मिळालं की, त्यानंतर आम्ही भाजपाला रोखू शकलो नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा