शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 17:03 IST

मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली

अमृतसर - अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना दसऱ्यादिवशी शुक्रवार (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील डीएमयू गाडी 11091 रेल्वेच्या ड्रायव्हरने लेखी स्वरुपात आपलं उत्तर दिलं आहे. अरविंद कुमार असे या रेल्वेच्या ड्रायव्हरचे नाव असून या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे. 

मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली. ते पाहताच मी गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा स्पीड लक्षात घेता गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे अनेकजण गाडीखाली येऊन मोठी दुर्घटना घडली. मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली. तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती दिली, असे या डीएमयु रेल्वेचे ड्रायव्हर अरविंद कुमार यांनी लेखी स्वरुपात दिली आहे. अमृतसर रेल्वे दुर्घटनेत 60 पेक्षा अधिक नागरिकांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यानंतर, आज रेल्वे ड्रायव्हरने आपला लेखी जबाब दिला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 61 झाली आहे. मृतांपैकी 9 जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र, त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही. 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाDeathमृत्यूAccidentअपघात