शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

...म्हणून 'या' शेतकऱ्याने राष्ट्रीय महामार्गच खोदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 11:55 IST

1951 मध्ये येथे अंबाला जगाधारी रस्ता बनविण्यात आला होता.

पानीपत : 1951 मध्ये येथील एका शेतकऱ्याची जमिन अधिग्रहन न करताच आधी कचराभुमीकडे जाणारा रस्ता नंतर राष्ट्रीय महामार्ग बांधण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. हा निकाल 67 वर्षांनी जरी लागला असला तरीही तो शेतकऱ्याच्या बाजुने असल्याने त्याने जमिनीतून जाणाऱ्या जवळपास 400 मीटर लांबीचा रस्ताच खोदल्याने अधिकाऱ्यांनी भंबेरी उडाली आहे. अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे दोन दिवसांची मुदत मागितली असून शेतकऱ्याने ती मान्य केल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरु केली आहे. 

शनिवारी या शेतकऱ्याने हा रस्ता खोदला. 1951 मध्ये येथे अंबाला जगाधारी रस्ता बनविण्यात आला होता. हरिपूर जट्टान वळणावरून कैल कचरा प्रकल्पापर्यंत हा रस्ता बनविण्यात आला होता. यावेळी या शेतकऱ्याची जमिन अधिग्रहन न करताच त्यावर रस्ता बांधण्यात आला होता. सुरुवातीला हा रस्ता मातीचा होता, त्याचा वापर केवळ शेतात जाण्यासाठीच केला जात असे. मात्र, सरकारने तो रस्ता ताब्यात घेऊन तेथे पक्का रस्ता बनविला होता. नंतर हा रस्ता मोठा करत राष्ट्रीय महामार्ग केला होता. या शेतकऱ्याच्या आजोबा- वडिलांनी वेळोवेळी सरकारला पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शेतकऱ्याचाच या जमिनीवर हक्क असल्याचे सांगितले. 

न्यायालयाच्या या निर्णयाने या राष्ट्रीय महामार्गाची हालतच बदलून गेली. खऱ्या मालकाला जमिनीचा हक्क मिळाल्यावर त्याने हा महामार्गच खोदून घातला. ही बातमी प्रशासनाला समजल्यानंतर अधिकारी याठिकाणी आले. त्यांना न्यायालयाचा निकाल दाखवताच पायाखालची वाळू सरकली. त्यांनी या शेतकऱ्याकडे सोमवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. काही ना काही मार्ग काढू. यावर शेतकऱ्यानेही सहमती दर्शविली असून खोदलेला रस्ता अधिकाऱ्यांनी पुन्हा दुरुस्त केला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNational Highwayराष्ट्रीय महामार्गFarmerशेतकरी