शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

...म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं; सुप्रीम कोर्टात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:33 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे.

नवी दिल्ली - खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाली काढला असला तरी या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. सध्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. त्यातच निवडणूक आयोगाने कशाच्या आधारे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना दिले याचा खुलासा केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं की, कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. शिंदेंकडे निवडणूक चिन्ह जाणे योग्य होते. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर लावलेले आरोप निराधार आहेत. संवैधानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय पातळीवर नाही. त्याचसोबत हे प्रकरण कोर्टासमोर आणू शकत नाही यावरही निवडणूक आयोगाने जोर दिला. 

कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला? निवडणूक आयोगाने त्यांच्या ७८ पानी निकालात म्हटलंय की, विधिमंडळापासून पक्षातील संघटनेपर्यंत बहुमत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे दिसले. आयोगासमोर दोन्ही गटाने आपापले दावे आणि कागदपत्रे सादर केली. एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर विजयी झालेल्या ५५ पैकी ४० आमदार होते. पक्षाच्या एकूण ४७ लाख ८२ हजार ४४० मतांपैकी ७६ टक्के म्हणजे ३६ लाख ५७ हजार ३२७ मतांची कागदपत्रे शिंदे गटाने आयोगासमोर सादर केली. त्याचमुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला. 

सत्तासंघर्ष सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हदरम्यान, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर झालेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. महाराष्ट्रातील सत्तांतरात राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर केला नाही? सरकार पाडण्यात राज्यपालांची भूमिका फायदेशीर ठरली. राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावं. आमदारांच्या जीवाला धोका आहे म्हणून बहुमत चाचणी घेण्यास राज्यपाल सांगू शकतात का? बहुमत चाचणी बोलवण्याइतपत सरकारवर संकट आले होते का? ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला असा प्रश्न राज्यपालांनी आमदारांना विचारायला हवा होता. पक्षात मतभेद असतील म्हणून बहुमत चाचणीचे आदेश देणे योग्य नाही असं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय