शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 09:20 IST

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो.

मुंबई - देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, 5 सप्टेंबर या दिनीच शिक्षक दिन का साजरा केला जातो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर, देशाची माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असल्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून गुरुंचे वंदन करुन, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो.

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, त्यामुळे जीवनात प्रत्येक वळणावर आपणास नवीन शिक्षक भेटतात. आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळेच शिक्षकांप्रती या दिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, 'हे  विश्वच माझी शाळा' असे राधाकृष्णन म्हणत असत. एकदा राधा कृष्णन यांचे काही शिष्य त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी, माझा जन्मदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अभिमान वाटेल, असे राधाकृष्णन यांनी म्हटले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. 5 सप्टेंबर 1962 मध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती होते. 

आंध्र प्रदेशच्या तिरुतनी शहरातील तेलुगु कुटुंबात 1982 साली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. आपल्या मुलाने धर्मगुरू व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, नियतीला काही वेगळच हवं होता. त्यानुसार, आपल्या मेहनतीच्या जोरावर ते तिरुपती आणि वेल्हूर येथून शिक्षकाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, मद्रास येथील एका ख्रिश्चन महाविद्यालयात त्यांनी तत्वज्ञान विषयाच्या अध्ययनाचे काम केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली असून त्यांनी 'द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर' या नावाने पुस्तक लिहिले आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत