शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 09:20 IST

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो.

मुंबई - देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, 5 सप्टेंबर या दिनीच शिक्षक दिन का साजरा केला जातो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर, देशाची माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असल्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून गुरुंचे वंदन करुन, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो.

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, त्यामुळे जीवनात प्रत्येक वळणावर आपणास नवीन शिक्षक भेटतात. आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळेच शिक्षकांप्रती या दिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, 'हे  विश्वच माझी शाळा' असे राधाकृष्णन म्हणत असत. एकदा राधा कृष्णन यांचे काही शिष्य त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी, माझा जन्मदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अभिमान वाटेल, असे राधाकृष्णन यांनी म्हटले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. 5 सप्टेंबर 1962 मध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती होते. 

आंध्र प्रदेशच्या तिरुतनी शहरातील तेलुगु कुटुंबात 1982 साली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. आपल्या मुलाने धर्मगुरू व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, नियतीला काही वेगळच हवं होता. त्यानुसार, आपल्या मेहनतीच्या जोरावर ते तिरुपती आणि वेल्हूर येथून शिक्षकाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, मद्रास येथील एका ख्रिश्चन महाविद्यालयात त्यांनी तत्वज्ञान विषयाच्या अध्ययनाचे काम केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली असून त्यांनी 'द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर' या नावाने पुस्तक लिहिले आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत