शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

... म्हणून AAP च्या बाजुने दिल्लीची जनता, गंभीरकडून केजरीवालांना शुभेच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:57 IST

आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते, पण जनतेनं अरविंद केजरीवाल यांना कौल दिला

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. आपला 50 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली असून दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे, अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या पराभवाचं कारण सांगितलं होतं. आता, खासदार गौतम गंभीरनेही आपले मत व्यक्त केलं आहे. 

आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते, पण जनतेनं अरविंद केजरीवाल यांना कौल दिला. भाजपाला अजून मोठं काम करायचं आहे, अजून कष्ट घ्यायचंय. येणाऱ्या 5 वर्षात आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील विकास आणि दिल्लीला उत्कृष्ट शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे गंभीरने म्हटले. तसेच, वीज मोफत, पाणी मोफत, मेट्रो मोफत यांमुळे जनता आम आदमी पक्षाच्या बाजुने झुकली. केजरीवाल यांनी निवडणुकांपूर्वीच मोफत सेवांची घोषणा केली. आता, या सेवा पुढील 5 वर्षांपर्यंत कायम ठेवाव्यात. 

भारतीय जनता पक्ष दिल्लीतील नागरिकांना सक्षम बनवू इच्छित आहे, लाचार नाही. त्यामुळे, अरविंद केजरीवाल हेही या मताशी सहमत असतील, तेही दिल्लीला सक्षम बनवतील. दिल्लीला अजूनही मोठ्या प्रमाणात शाळा, विद्यापीठ आणि रुग्णालयांची गरज आहे. दिल्लीतील महिलांची सुरक्षा हाही मोठा विषय असल्याचं गंभीरने म्हटले. तर, अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या गंभीरने आहेत.

दरम्यान, दिल्लीत सत्तास्थापन करण्याइतके आम्हाला यश मिळाले नाही. मात्र 3 जागांवरून 18 ते 20 जागा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तब्बल सहापटीने आम्ही पुढे गेलो आहेत. तसेच हे खरं आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तोडीस-तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची कबुली भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाAAPआपGautam Gambhirगौतम गंभीरdelhi electionदिल्ली निवडणूक