शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:17 IST

"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे."

इम्फाळ : मणिपूरमधील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेला जातीय संघर्ष लवकर सुटला नाही तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीचे २१ खासदार शनिवारपासून मणिपूरच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल अनुसुया उइके यांची भेट घेतली. तसेच, इशान्येतील या राज्यातील परिस्थितीबाबत एक निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बैठकीनंतर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर सहमती दर्शविली. त्यावर राज्यपाल उइके म्हणाल्या की, मैतेई आणि कुकी समुदायांमधील अविश्वास संपविण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट दिली पाहिजे. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

पीडितांची विचारपूस - दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, शिष्टमंडळाने बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग आणि चुराचांदपूर येथील अनेक मदत छावण्यांना भेट दिली तसेच जातीय संघर्षाची झळ बसलेल्या लोकांच्या भेटी घेतल्या. - मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले. - या शिष्टमंडळाने काही शिबिरांना भेट देऊन विचारपूस केली. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे सदस्य दुपारी दिल्लीला रवाना झाले.

या भागात अशी परिस्थिती आहे की, खोऱ्यातील मैतेई लोक कुकी राहत असलेल्या डोंगराळ प्रदेशात जाऊ शकत नाहीत आणि डोंगराळ प्रदेशातील लोक खोऱ्यात येऊ शकत नाहीत. धान्य, दूध, मुलांचे भोजन आणि अन्य आवश्यक वस्तूंची टंचाई आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे.     - अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते

केंद्र सरकारला संसदेत चर्चा करण्याचे आवाहनचौधरी यांनी सांगितले की, खासदारांनी मणिपूरमध्ये जी परिस्थिती पाहिली त्याबद्दल ते संसदेत अहवाल सादर करतील आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मणिपूरमधील राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकांवर आम्ही संसदेत बोलू. आम्ही केंद्र सरकारला या विषयावर संसदेत चर्चा करण्याचे आवाहन करतो.

तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलेलेचमणिपूर तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून अशांत आहे. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हा संघर्ष पेटला हाेता. यामुळे राज्यातून हजाराे लाेक स्थलांतर करीत आहेत. कुकी समुदायाने स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. दाेन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. संसदेतही यावरून प्रचंड गदराेळ झाला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा