शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

स्मृती इराणी व कथेरिया यांच्या विधानांचे संसदेत गंभीर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 02:38 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांच्या वादग्रस्त विधानांवर लोकसभा आणि राज्यसभेत हक्कभंग व लक्षवेधी सूचना दाखल करीत

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांच्या वादग्रस्त विधानांवर लोकसभा आणि राज्यसभेत हक्कभंग व लक्षवेधी सूचना दाखल करीत कथेरियांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस व अन्य विरोधकांनी केली. तथापि हक्कभंग प्रस्तावारील चर्चा हाणून पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या सहयोगी अण्णा द्रमुकने माजी मंत्री चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या कथित भ्रष्टाचाराचे आरोप करणारी पत्रके फडकवीत घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित होत अखेर दुपारी दिवसभराकरीता तहकूब झाले. तथापि हा मुद्दा आपण सोडणार नाही, सरकारला संसदेत त्याचे उत्तर द्यावेच लागेल, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ठणकावले.रोहित वेमुला व जेएनयु प्रकरणाचा खुलासा करताना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्मृती इराणींनी खोटी माहिती देत सभागृहांची दिशाभूल केली, तसेच खासदार पती राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या पत्राचा उल्लेख करीत सुपौलच्या काँग्रेस खासदार रंजिता रंजन यांना इराणींनी लोकसभेत अपमानित केले. त्यामुळे विशेषाधिकाराचा भंग केल्याचा आरोप करीत, काँग्रेसने इराणींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. स्मृती इराणी व कथेरिया दोघांच्या वादग्रस्त विधानांवरील हक्कभंग प्रस्तावांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी विरोधकांची प्रमुख मागणी होती. मात्र अण्णा द्रमुकच्या सदस्यांना गोंधळ घालायला लावून, सत्ताधाऱ्यांनी कामकाज हाणून पाडले, असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगेंनी केला.राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या अण्णाद्रमुक सदस्यांना उपसभापती कुरियन यांनी वारंवार बजावले की मुळात कार्ती चिदंबरम हे या सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांच्यावर काही आरोप करायचे असतील तर ते सदस्यांनी सरकारकडे करावेत. सभागृहात गोंधळ घालून काहीही निष्पन्न होणार नाही. राज्यसभेचे सभापती अथवा उपसभापती म्हणजे सरकार अथवा न्यायालय नव्हे, या प्रकरणात आम्ही काहीच करू शकत नाही. तरीही कुरियन यांचे निर्देश अथवा विनवण्या ऐकण्याच्या मन:स्थितीत गोंधळी खासदार नव्हते. त्यांनी उभय सभागृहांचे कामकाज दिवसभराकरीता बंद पाडले. (विशेष प्रतिनिधी)संसदेबाहेर कथेरियांवर थेट आरोप करीत काँग्रेसचे गटनेते खरगे म्हणाले, दोन समुदायांमधे धार्मिक विद्वेष निर्माण करून समाजस्वाथ्य बिघडवण्याचा रा.स्व.संघ व भाजपचा डाव आहे. निवडणुका येताच हे मुद्दाम कुरापती काढतात. जद (यु)चे अली अनवर म्हणाले, राज्यमंत्र्यांचे वक्तव्य धोकादायक आणि देशाची एकात्मता तोडणारे आहे. कथेरियांना मंत्रिमंडळातून थेट बरखास्त करण्याची मागणी मायावतींनी केली. काँग्रेस नेते पी.एल पुनिया म्हणाले, कथेरियांचे भाषण सांप्रदायिक विष उगाळणारे आहे. एमआयएमच्या असाउद्दिन ओवेसींनीही कथेरियांच्या भाषणाचा संदर्भ देत सबका साथ सबका विकास घोषणा देणाऱ्या सरकारचा निषेध केला.1 आग्य्रात विहिंपचे कार्यकर्ते अरूणकुमार यांच्या शोकसभेत कथेरियांनी वादग्रस्त भाषण ठोकले. ‘हिंदु समुदायाने आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे, अशी गर्जना करीत, स्थानिक प्रशासनाला कथेरियांनी बजावले की मंत्रिपद स्वीकारल्याने माझे हात बांधलेले आहेत असे समजू नका, मीदेखील कधीकाळी हातात लाठ्या घेउनच फिरत असे’. 2 कथेरियांच्या भाषणाची चित्रफित वाहिन्यांवरून दाखवली गेल्यावर आपण असे बोललोच नाही, केवळ स्वसंरक्षणासाठी हिंदुंनी संघटीत व्हावे, इतकेच म्हणालो, असा खुलासा कथेरियांनी केला. 3 त्यांना भाजपने क्लीन चीट दिल्याची बातमी समजताच, दोन्ही सभागृहांत त्याचे पडसाद उमटले. काँग्रेस, डावे पक्ष, सीपीआय (एमएल) आदी पक्षांनी कथेरियांच्या विरोधात हक्कभंग व आग्य्राच्या घटनेवर लक्षवेधी सूचना दाखल केल्या. त्यावर चर्चा होऊ नये, यासाठी सत्ताधारी आघाडीने अण्णा द्रमुकला गोंधळ घालण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझादांनी केला.