शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 6:36 AM

केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा

नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही राज्यांमध्ये जाताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई येथून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.कर्नाटक, गोवा, छत्तीसगढ या राज्यांतही अशीच बंधने आहेत. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी सर्व राज्यांनी एकाच प्रकारची नियमावली अंमलात आणावी.  आंतरराज्य प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोरोना काळात विविध राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा आरटी-पीसीआर करायला न लावता महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्ये आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत.समान नियम लागू कराकोरोना काळात देशातील सर्व राज्यांनी प्रवेशाबाबतचे समान नियम तयार केले तर पर्यटकांना, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असे केंद्र सरकारला वाटते. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खाते, नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या