शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

टीएमसीच्या 6 आमदारांची बंडखोरी, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 6:33 PM

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत.

नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय जनता पार्टीनं उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच त्रिपुरा विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकही आमदार नसलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपाला अचानक 6 आमदारांचं बळ मिळालं आहे.भाजपा आता त्रिपुरा विधानसभेतील प्रमुख विरोध पक्ष बनला आहे. तिस-या आणि शेवटच्या स्थानी असलेल्या काँग्रेसजवळ फक्त 4 आमदार आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुदीप रॉय बर्मन, आशिष कुमार साहा, दीबा चंद्र हंगखावस, बिस्व बंधू सेन, प्रांजित सिंह रॉय आणि दिलीप सरकार यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. 2013मधल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी 60 पैकी 50 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यावेळी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या, तर टीएमसीला साधं खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र 2016मधली पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक डावे आणि काँग्रेसनं एकत्र मिळून लढली. त्यावेळी या 6 आमदारांनी डाव्यांची साथ सोडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले होते. मात्र तृणमूल काँग्रेसनंही गेल्या काही दिवसांपूर्वीच या 6 आमदारांची पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे हे 6 आमदार भाजपामध्ये दाखल झाले असून, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.एखाद्या विधानसभेत पक्षाकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असताना इतर आमदारांनी बंडखोरी केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. जर एखाद दुस-या आमदारानं असं केलं असतं तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं असतं. मात्र काँग्रेसमध्येच असताना 6 आमदारांच्या एका गटानं बंडखोरी केली होती. आता त्याच 6 आमदारांनी भाजपामध्ये जाणं पसंत केलं आहे. एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसनं या आमदारांची हकालपट्टी केली.येत्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीआधीच हे 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाल्यानं भाजपाला त्रिपुरात बळ मिळालं आहे. या 6 आमदारांना तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याचं श्रेय आसामचे भाजपाचे नेते आणि शिक्षा मंत्री हिमंत विश्वकर्मा यांना जातं. भाजपा त्रिपुरात कधीच कोणताही जागा जिंकू शकलेली नाही. तसेच तृणमूल काँग्रेसचे इतरही पदाधिकारी लवकरच भाजपामध्ये सहभागी होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.