शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:16 IST

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Dehradun Accident: देहरादून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तराखंड हादरले आहे. एका चौकात भरधाव इनोव्हाने कंटेनरला धडक दिल्याने सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी दोन तरुणांची डोकी कारच्या सनरूफमधून बाहेर होती. गाडीची कंटेनरला धडकताच या दोन तरुणांची मान त्यांच्या शरीरापासून वेगळी झाली. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जीव गेला. तीन दिवस उलटूनही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचवेळी या अपघातातून बचावलेला एकमेव जखमी तरुणही रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. 

सोमवारी रात्री उशिरा बल्लुपूर चौक-गारिकांत रस्त्यावर ओएनजीसी चौकातून जाणाऱ्या कंटेनरला सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची धडक बसली. या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातात कारचे छत तुटल्याने तरुण आणि तरुणीचे डोके धडावेगळे झाले. तर उर्वरित चौघांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले. 

मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी या अपघाताबाबत कोणीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बल्लूपूरहून गढी कॅन्टच्या दिशेने जात असताना सर्व मित्र एकत्र पार्टी करत होते आणि खूप आनंदी होते. भरधाव जाणाऱ्या कारची धडक एवढी भीषण होती की, गाडीचा चुराडा झाला आणि आत बसलेल्या तरुणांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. तरुण दारू पिऊन गाडी चालवत होते. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करत होते, असे विविध दावे केले जात आहेत. आता डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटलं आहे. 

"आम्ही शहरातील विविध भागातील कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात कार अतिशय संथ गतीने जात आहे. म्हणजे ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत तथ्य नाही. फक्त, अपघाताच्या ठिकाणी गाडीचा वेग वाढला होता. अचानक वाहनाचा वेग वाढण्यासारखे काय झाले, हा तपासाचा विषय आहे. कारच्या ब्रेकखाली पाण्याची बाटली सापडली आहे. मात्र अपघातापूर्वी ती ब्रेकखाली आली की अपघातानंतर याचा तपास करण्यात येत आहे. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करण्याची माहिती देखील चुकीची आहे. बाकी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर कळेल. अपघाताच्या वेळी तर सनरूफवर बसले नव्हते तर कारमध्ये बसले होते. शवविच्छेदनात मद्यपान करून गाडी चालवल्याचे आढळून आले नाही," अशी माहिती अजय सिंह यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुनीत (१९), नव्या गोयल (२३) आणि कामाक्षी (२०) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि ऋषभ जैन (२४) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा तरुण सिद्धेश अग्रवाल (२५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातPoliceपोलिस