शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:16 IST

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Dehradun Accident: देहरादून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तराखंड हादरले आहे. एका चौकात भरधाव इनोव्हाने कंटेनरला धडक दिल्याने सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी दोन तरुणांची डोकी कारच्या सनरूफमधून बाहेर होती. गाडीची कंटेनरला धडकताच या दोन तरुणांची मान त्यांच्या शरीरापासून वेगळी झाली. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जीव गेला. तीन दिवस उलटूनही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचवेळी या अपघातातून बचावलेला एकमेव जखमी तरुणही रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. 

सोमवारी रात्री उशिरा बल्लुपूर चौक-गारिकांत रस्त्यावर ओएनजीसी चौकातून जाणाऱ्या कंटेनरला सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची धडक बसली. या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातात कारचे छत तुटल्याने तरुण आणि तरुणीचे डोके धडावेगळे झाले. तर उर्वरित चौघांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले. 

मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी या अपघाताबाबत कोणीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बल्लूपूरहून गढी कॅन्टच्या दिशेने जात असताना सर्व मित्र एकत्र पार्टी करत होते आणि खूप आनंदी होते. भरधाव जाणाऱ्या कारची धडक एवढी भीषण होती की, गाडीचा चुराडा झाला आणि आत बसलेल्या तरुणांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. तरुण दारू पिऊन गाडी चालवत होते. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करत होते, असे विविध दावे केले जात आहेत. आता डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटलं आहे. 

"आम्ही शहरातील विविध भागातील कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात कार अतिशय संथ गतीने जात आहे. म्हणजे ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत तथ्य नाही. फक्त, अपघाताच्या ठिकाणी गाडीचा वेग वाढला होता. अचानक वाहनाचा वेग वाढण्यासारखे काय झाले, हा तपासाचा विषय आहे. कारच्या ब्रेकखाली पाण्याची बाटली सापडली आहे. मात्र अपघातापूर्वी ती ब्रेकखाली आली की अपघातानंतर याचा तपास करण्यात येत आहे. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करण्याची माहिती देखील चुकीची आहे. बाकी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर कळेल. अपघाताच्या वेळी तर सनरूफवर बसले नव्हते तर कारमध्ये बसले होते. शवविच्छेदनात मद्यपान करून गाडी चालवल्याचे आढळून आले नाही," अशी माहिती अजय सिंह यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुनीत (१९), नव्या गोयल (२३) आणि कामाक्षी (२०) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि ऋषभ जैन (२४) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा तरुण सिद्धेश अग्रवाल (२५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातPoliceपोलिस