शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:16 IST

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Dehradun Accident: देहरादून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तराखंड हादरले आहे. एका चौकात भरधाव इनोव्हाने कंटेनरला धडक दिल्याने सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी दोन तरुणांची डोकी कारच्या सनरूफमधून बाहेर होती. गाडीची कंटेनरला धडकताच या दोन तरुणांची मान त्यांच्या शरीरापासून वेगळी झाली. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जीव गेला. तीन दिवस उलटूनही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचवेळी या अपघातातून बचावलेला एकमेव जखमी तरुणही रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. 

सोमवारी रात्री उशिरा बल्लुपूर चौक-गारिकांत रस्त्यावर ओएनजीसी चौकातून जाणाऱ्या कंटेनरला सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची धडक बसली. या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातात कारचे छत तुटल्याने तरुण आणि तरुणीचे डोके धडावेगळे झाले. तर उर्वरित चौघांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले. 

मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी या अपघाताबाबत कोणीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बल्लूपूरहून गढी कॅन्टच्या दिशेने जात असताना सर्व मित्र एकत्र पार्टी करत होते आणि खूप आनंदी होते. भरधाव जाणाऱ्या कारची धडक एवढी भीषण होती की, गाडीचा चुराडा झाला आणि आत बसलेल्या तरुणांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. तरुण दारू पिऊन गाडी चालवत होते. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करत होते, असे विविध दावे केले जात आहेत. आता डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटलं आहे. 

"आम्ही शहरातील विविध भागातील कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात कार अतिशय संथ गतीने जात आहे. म्हणजे ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत तथ्य नाही. फक्त, अपघाताच्या ठिकाणी गाडीचा वेग वाढला होता. अचानक वाहनाचा वेग वाढण्यासारखे काय झाले, हा तपासाचा विषय आहे. कारच्या ब्रेकखाली पाण्याची बाटली सापडली आहे. मात्र अपघातापूर्वी ती ब्रेकखाली आली की अपघातानंतर याचा तपास करण्यात येत आहे. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करण्याची माहिती देखील चुकीची आहे. बाकी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर कळेल. अपघाताच्या वेळी तर सनरूफवर बसले नव्हते तर कारमध्ये बसले होते. शवविच्छेदनात मद्यपान करून गाडी चालवल्याचे आढळून आले नाही," अशी माहिती अजय सिंह यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुनीत (१९), नव्या गोयल (२३) आणि कामाक्षी (२०) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि ऋषभ जैन (२४) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा तरुण सिद्धेश अग्रवाल (२५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातPoliceपोलिस