शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:37 AM

स्वत:च्याच फार्महाऊसवर लिफ्ट तळाचा पत्रा निखळून ७० फुटांवरून कोसळली

इंदूर : आठ राज्यांमध्ये हजारो कि.मी. लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करणाऱ्या ‘प्रकाश अ‍ॅस्फाल्टिंग्ज अ‍ॅण्ड टोल हायवे (पाथ इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक पुनीत अग्रवाल कुटुंब व मित्र परिवारातील पाच जणांसह मंगळवारी रात्री त्यांच्याच फार्महाऊसवर लिफ्ट कोसळून ठार झाले.अग्रवाल यांच्या पाताळपाणी येथील फार्महाऊसवर हा अपघात झाला. त्यात पुनीत अग्रवाल (५३ वर्षे), मुलगी पलक, जावई पलकेश अग्रवाल, नातू नव आणि पलकेश यांचे मुंबईतील मेव्हणे गौरव आणि त्यांचा मुलगा अर्यवीर यांचे निधन झाले. गौरव यांची पत्नी निधी यांची अनेक हाडे मोडल्याने प्रकृती गंभीर आहे.पुनीत अग्रवाल व त्यांचे मित्र ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी फार्महाऊसवर सहकुटुंब आले होते. परिसरातील निसर्गसौंदर्य उंचावरून पाहता यावे, यासाठी अग्रवाल यांनी परिसरात टॉवर उभारला आहे. ‘कॅप्स्यूल’ लिफ्टने वरच्या प्रेक्षक गॅलरीत जाता येते.अपघात पाहिलेल्यांनी सांगितले की, संध्याकाळी पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण लिफ्टने वर गेले. नंतर खाली निघाले. लिफ्टची क्षमता नसल्याने पुनीत यांचा मुलगा निपुण वरच थांबला. सहा जणांना घेऊन लिफ्ट टॉवरवरून खाली येत असता लिफ्टच्या तळाचा पत्रा निखळला व सर्व जण सुमारे ७० फूट उंचीवरून खाली कोसळले.पुनीत यांची पत्नीही सोबत गेली होती. मात्र, ती वर न जाता ते सर्व जण परत येण्याची वाट पाहत खालीच होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व अनेक मान्यवरांनी अग्रवाल कुटुंबावर मृत्यूने घातलेल्या या आकस्मिक घाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. (वृत्तसंस्था)एकाच चितेवर अंत्यसंस्कारबुधवारी महूजवळील मुक्तिधाम स्मशानभूमीत पुनीत अग्रवाल व नातू यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अंत्ययात्रेत आप्त, मित्र व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होते. मुक्तिधाम स्मशानभूमी नव्याने बांधण्याचे काम अग्रवाल यांचीच कंपनी करीत आहे. पुनीत यांची कन्या व जावई यांच्यावर इंदूर येथे अंत्यसंस्कार झाले, तर गौरव व आर्यवीर यांचे पार्थिव मुंबईला नेण्यात आले.